राष्ट्रसंत साहित्य परिषदेच्या वतीने दिवं. उषाताई हजारे यांना श्रद्धांजली अर्पण:उषाताई श्रीगुरुदेव सेवा मंडळाच्या समर्पित प्रचारिका-बंडोपंत बोढेकर 

98

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)मो:-8605592830

चंद्रपूर(दि.17मार्च):-मानवतेचे महान पुजारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या चंद्रपूर येथील ज्येष्ठ अनुयायी तथा अ.भा.श्रीगुरुदेव सेवा मंडळाच्या आजीवन प्रचारिका श्रीमती उषाताई कृष्णराव हजारे यांचे वृध्दपकाळाने वयाच्या ९३ व्या वर्षी निधन झाले.  

      राष्ट्रसंत विचार साहित्य परिषद केंद्रीय समितीच्या वतीने ऑनलाईन श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेच्या अध्यक्षस्थानी ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर होते . याप्रसंगी एड. राजेंद्र जेनेकर (राजुरा) यांनी प्रस्तावना करून उषाताईच्या जीवन कार्यावर सविस्तर प्रकाश टाकला .

       तर योगतज्ञ विनायक साळवे (बल्लारपूर) आणि शंकर दरेकर (उर्जानगर) यांनी उषाताईंनी तळमळीने केलेले प्रचारकार्य यासंबंधीत विचार व्यक्त केले. राजेंद्र मोहितकर (चिमूर) म्हणाले की, उषाताईंनी श्रीगुरुदेव सेवा मंडळाच्या कार्यात अनेक महिलांना जोडले. प्रा. नामदेव मोरे(घुग्घुस) आणि डॉ. धर्मा गांवडे (सावली )यांनी उषाताईंच्या त्यागी जीवनावर प्रकाश टाकला. देवराव कोंडेकर (उर्जानगर), सुभाष पावडे (विरूर स्टेशन),लटारू मते (राजुरा) ,भाऊराव बोबडे( रामपूर ), प्राचार्य राजू मोतीराव (नांदेड), श्रीकांत धोटे (नागपूर) आदींनी उषाताईंच्या प्रेरक आठवणी कथन करून श्रद्धांजली अर्पण केली.

कार्यक्रमाध्यक्ष बंडोपंत बोढेकर म्हणाले की, उषाताईं राष्ट्रसंतांच्या विचारांच्या समर्पित प्रचारिका होत्या. त्यांनी राष्ट्रसंतांचा मानवतावादी विचार शहरी तसेच ग्रामीण भागात पोहोचवण्याचा प्रयत्न केला. नव्या पीढीत आदर्श संस्कार रूजवण्याचे कार्य केले. त्यांचे जीवन आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचे मत श्री. बंडोपंत बोढेकर यांनी व्यक्त केले. या सभेचे तंत्रनियोजन डॉ. श्रावण बानासुरे यांनी केले. राष्ट्रवंदना व जयघोषानंतर सभा संपन्न झाली.