धर्माच्या अभि उत्थानाची वेळ आली आहे

83

 अर्थहिन प्रतिके पुजली जातात तेंव्हा धर्म यंत्रमय होतो. त्यात बिघाड होऊ शकतो. म्हणून काही काळानंतर धर्माचे पुनर्जीवन करावे लागते. धर्म म्हणजे संकल्पना. धर्म म्हणजे सिद्धांत. धर्म म्हणजे तत्वज्ञान. धर्म म्हणजे कर्मकांड नव्हे. कर्मकांड म्हणजे धर्म नव्हे. आता धर्म धुसर झाला आहे आणि कर्मकांड बोकाळलेले आहे.

     अशा वेळी हिंदू धर्माची मूळ संकल्पना, मुळ सिद्धांत ,मुळ तत्वज्ञान पुन्हा रिन्यू करावे लागते. जी गीतेत सांगितले आहे. सांगावे लागले. युद्धभुमिवर गीता सांगणे ही नितांत आवश्यकता होती.तिच वेळ आता आली आहे.

    धर्माला अशी ग्लानी अवस्था येते, त्यांची लक्षणे आहेत. तेंव्हा राजकीय नेते, गुंड, गुन्हेगार धर्माचा सहारा घेऊन अधर्मी कृत्य करतात. आता ती अवस्था झाली आहे. धर्म कलहाचे कारण ठरतो, धर्म अत्याचाराचे कारण ठरतो, धर्म नरसंहाराचे कारण ठरतो तेंव्हा धर्म मोडकळीस आला आहे, असा निष्कर्ष निघतो. धर्माची मुळ संकल्पना धुसर होते. त्यावर धुळ साचते. कर्मकांड म्हणजेच धर्माचरण वाटू लागते. यालाच ग्लानी असे म्हणतात. ग्लानी म्हणजे चक्कर येऊन तोल जाणे.

     ज्या लोकांना धर्माची संकल्पना, धर्माचे तत्वज्ञान समजत नाही त्यांना कर्मकांड सांगितले जाते. ज्यात बुद्धीचा वापर न करता फक्त कृती केली जाते. अर्थ न कळता आचरण केले जाते. तेंव्हा धर्म यंत्रमय होतो. मेकॅनिकल. असे कर्मकांड करणारे लोक धर्माची मुळ संकल्पना, मुळ सिद्धांत, मुळ तत्वज्ञान न जाणता कर्मकांड करतात. ते चुकीच्या दिशेने जाऊ शकतात.

   ही अवस्था म्हणजे श्रीकृष्ण गीतेत सांगतात तशी ग्लानी आलेली आहे. आता धर्माचे अभि उत्थान करण्याची वेळ आलेली आहे.

   कुंभ मेळाव्यात स्नान करणारे तथाकथित साधू ,संत कोणताही धर्म सांगत नाहीत. कोणतेही तत्वज्ञान जाणत नाहीत. नागांचा नंगानाच चालू आहे. अवैध धंदे करणारे,अब्रुहिन बाया माणसे महामंडलेश्वर बनत आहेत. हीच तर ग्लानीची लक्षणे आहेत. हीच तर अवस्था आहे.

    प्रयागच्या कुंभमेळा हून परत आलेल्या पुणे येथील सुशिक्षित स्त्री पुरूषांना मी विचारले कि, 

कुंभमेळा जाण्याआधी आणि जाऊन आल्यानंतर तुमच्यात काय बदल झाला?

म्हणे काहीच नाही.

तेथे तुम्हाला कोणते ज्ञान प्राप्त झाले?

म्हणे, काहीच नाही.

मग गेले कशासाठी होते?

ते सांगता येत नाही.

हां! तेथे खूप गर्दी होती. गर्दीत बाया, पोरं, म्हातारे पायाखाली चेंगराचेंगरीत मेले. आम्ही नशीबवान होतो म्हणून वाचलो. इतकेच ते सांगत होते.

      म्हणजे ते नशीबवान आहेत,याची परीक्षा देऊन पास होऊन आले. मी पाप केले कि पुण्य? मी चूक कि बरोबर? या संभ्रमात पडलेले आहेत.ही भ्रमित अवस्था कुरू क्षेत्रावरील अर्जुनासारखी झालेली आहे. अर्जुनाला आतापर्यंत जे ज्ञान होते ते भ्रम निर्माण करणारे होते. म्हणून तो गोंधळात पडला होता. त्यावेळेस श्रीकृष्णाने धर्माचा नवीन फार्म सांगितला. गीता‌. रिफर्मेशन ऑफ रिलीजन. पुन्हा रिफर्मेशन करण्याची गरज आहे.

    आज भारतातील राजकीय परिस्थिती नितीमत्ताहिन झालेली आहे. जशी महाभारत काळात झाली होती. धर्माचे पुनर्त्थान करण्याची वेळ आलेली आहे.

✒️शिवराम पाटील(महाराष्ट्र जागृत जनमंच)मो:-९२७०९६३१२२