नावलौकिकास आलेल्या पत्रकारांची दैनिक महासागर अनुभव शाळा-कायदे पंडित जस्टीस विजय डागा

85

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)मो:-8605592830

नागपूर(दि.7एप्रिल):- मानवाची महत्वकांक्षा ही त्याला पडलेले स्वप्न असून हे स्वप्न आपल्या कर्तुत्वातून सिद्ध करण्याची ताकद दैनिक महासागरचे मुख्य संपादक श्रीकृष्ण चांडक यांनी दाखवून दिली आहे, तेव्हाच हे वृत्तपत्र आज 55 वा वर्धापन दिवस साजरा करीत आहे. 1980 ला आर्थिक विवंचनेतून जात असताना श्रीकृष्ण चांडक यांच्याशी पक्षकार म्हणून झालेल्या भेटीत हा साक्षात्कार झाला. 55 वर्षांच्या काळात अनेक पत्रकार येथून शिकून मोठे झाले आहेत व प्रदीप मैत्र, मोरेश्वर बडगे व शाम जुवेकर यांच्यासारखे कित्येक पत्रकार नावालौकिकास आलेले आहेत त्यामुळे दैनिक महासागर ही पत्रकारांची अनुभव शाळा आहे असे प्रतिपादन महासागर कर्मयोगी पुरस्कार 2025 या सोहळ्याचे अध्यक्ष कायदे पंडित जस्टीस विजय डागा यांनी केले.

                                              दैनिक महासागरच्या 55 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून महासागर कर्मयोगी पुरस्कार 2025 या सोहळ्याचे आयोजन माहेश्वरी भवन येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून कायदे पंडित जस्टीस विजय डागा, उद्योगपती प्रकाश वाघमारे, जॉईंट कमिशनर इन्कम टॅक्स संजय अग्रवाल, एड. सुरेश ढोले, दैनिक महासागर चे मुख्य संपादक श्रीकृष्ण चांडक उपस्थित होते.

                     याप्रसंगी वैद्यकीय क्षेत्रातील महासागर कर्मयोगी पुरस्कार उपचार महर्षी पद्मश्री डॉ. विलास डांगरे, पत्रकारिता क्षेत्रातील पुरस्कार पत्रतपस्वी कमलाकर धारप, सेवाभावी संस्था म्हणून प्रगती राजस्थानी महिला मंडळ आणि तळागाळातील व्यक्तीच्या विकासासाठी झटणारे डॉक्टर हरीश धुरट यांना विजय डागा आणि प्रकाश वाघमारे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. 25 हजार रुपये रोख शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व ग्रंथ हे या पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी महासागर स्मरणिकेचे विमोचन करण्यात आले.

याप्रसंगी विजय डागा म्हणाले की लोकशाहीसाठी आवश्यक असलेली पत्रकारितेतील पारदर्शकता, स्वतंत्रता सरकारी नियंत्रणांमुळे व खाजगी कंपन्यांची मालकी किंवा व्यक्तीचा ताबा यामुळे धोक्यात आलेली आहे. सोशल मीडिया सारख्या तंत्रज्ञानाचा गैरवापर करून खोट्या बातम्या पसरविल्या जात आहे यावर अंकुश येणे गरजेचे आहे. यावेळी बाळासाहेब ठाकरे, नरेंद्र मोदी, लता मंगेशकर, अटल बिहारी वाजपेयी यांच्यासारख्या गणमान्याना आपली होमिओपॅथी चिकित्सा देऊन बरे करणारे डॉक्टर विलास डांगरे म्हणाले की सत्य तत्वावर आधारित होमिओपॅथी चिकित्सा ही अजूनही उपेक्षित व विडंबित आहेत ही चिकित्सा तळागाळातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न आहे.

समाजकारण व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सानिध्यातून मला गोरगरिबांची सेवा करण्याची प्रेरणा मिळाली आणि ही सेवा ही अखंडपणे करीत आहे अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. कष्टकरी कामगार व माथाडी कामगारांचे दैवत असणारे सामाजिक कार्यकर्ते हरीश धुरट हे म्हणाले की दारिद्र्य रेषेवरील माणूस आपल्या डोक्याचा वापर हा विकास प्रक्रियेसाठी करीत असतो तर रेल्वे स्थानावरील कुली, भारवाहक , कष्टकरी कामगार हे आपल्या डोक्याचा वापर आपल्या पोटासाठी करत असतात. 50 किलो वजन असणारे व्यक्ती 100 ते 110 वजनी भार उचलून नेतात. या विरुद्ध लढा देऊन 1998 सांगली राष्ट्रपतींनी 50 किलो वजनी माणसाने 50 पेक्षा कमी वजन उचलण्याचा आदेश काढला तो 2011 पर्यंत अमलात येईपर्यंत आंदोलन करावे लागले. यावेळी जेष्ठ पत्रकार कमलाकर धारप यांनी आपल्या पत्रकारितेतील 50 वर्षाचा प्रवास उलगडला तर सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक अशा सर्वच स्तरावर सामाजिक बांधिलकी बांधणाऱ्या प्रगती राजस्थान महिला मंडळ च्या अध्यक्ष सरला सोमानी यांनी महासागर वृत्तपत्राकडून या पुरस्कारासाठी आमची निवड करून आमच्या उत्कृष्ट कामाची पावती दिली आहे.त्याबद्दल आम्ही आभारी असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.

श्रीकृष्ण चांडक यांनी आपल्या प्रस्तावनेमध्ये म्हटले आहे की ज्याला कष्ट करायचे आहे त्यांनी वृत्तपत्र चालवावे आणि जो सत्यनिष्ठा बाळगून मेहनत करण्याची तयारी ठेवतो तोच पत्रकार आहे बाकी पत्रावळीकर आहे. दैनिक महासागर च्या 54 वर्षाच्या काळात अनेक अडचणींचा व कर्जबाजारीपणाचा सामना करावा लागला. एक वेळ अशी आली की घरचे सोने चांदी दागिने विकावे लागले पण मी डगमगलो नाही देवेंद्र फडणवीस यांनी वृत्तपत्राचे दर त्या काळाच्या तुलनेत अडीच पटीने वाढवून पत्रकारितेला सुवर्ण दिवस आणून दिले. आणि आज जे चांगले दिवस पाहायला मिळत आहे त्याचे सर्व श्रेय आताचे व त्यावरचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाते. यावेळी मंचावर दैनिक महासागर चे सीईओ उमाशंकर लाल, प्रभाकर दुपारे, राहुल चांडक, पंकज चांडक, विशाल चांडक, प्रवीण डबली, कमल नामपल्लीवार व समस्त महासागर परिवार उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन रेखा दंडीगे घीया व आभार प्रदर्शन प्रवीण डबली यांनी केले.