शुद्ध विरोधात शुद्र!

44

सुबुद्ध, प्रबुद्ध लोकांनी लढा सुरू केला आहे. ही माणसे एकत्र येऊन लढली तर नक्कीच परिणामकारक ठरेल.

आम्ही जळगाव जिल्ह्यातून याची सुरूवात केली आहे. महाराष्ट्र जागृत जनमंच या संघटनेच्या माध्यमातून. यात अधिकतम बुद्धिमान, उच्चशिक्षित, ज्ञानी प्रामाणिक लोक काम करतात. ते आमंत्रित नाहीत. ते स्वेच्छेने जोडली गेली आहेत.

     काही सामान्य लोक त्यांच्या समस्या असली तरच आमच्या सोबत येतात. आमची मदत घेऊन कामाचा निपटारा करतात. कुठे भंडाराचा मंडप दिसला कि जेवायला निघून जातात. असे शुद्र प्रवृत्ती चे लोक जास्त आहेत. शुद्ध प्रवृत्ती चे लोक कमी आहेत. राम, कृष्ण, बुद्ध, गांधी एकटेच होते. त्यांनी सोबत येण्याची हाक दिली. पण क्वचितच लोकांनी त्यांना साथ दिली. तसेच आमची संख्या कमी आहे. पण सत्य, आत्मविश्वास,साहस बाळगून आहोत.

      बुद्धीवंतांची डोकी मोजून उपयोग होत नाही. तर त्यांची बुद्धी, ज्ञान, निती मोजली जाते. मुर्खांची डोकी मोजली जातात. डोक्यातील मेंदू मोजला जात नाही. कारण तो तितका कार्यक्षम नसतो. त्यांचे पोट जास्त कार्यक्षम असते. जेवण झाल्यावर सुद्धा अन्नाची गाठोडी बांधून नेतात. श्रीमंत असूनही चोरी करतात. असे लोक शुद्र प्रवृत्ती चे असतात. ते येतात, जातात. पशुवत असतात. गाय, बैल, म्हैस, बकरी, कुत्रा यांना तुपाची पोळी खाऊ घातली तरीही ते शेण खाणारच.

   महाराष्ट्र जागृत जनमंच मधे अनेक लोक समस्या होती म्हणून सोबत आले. त्यांची समस्या निराकरण झाली. त्यांना महाराष्ट्र जागृत जनमंच आवडला. कौतुक केले. पण भंडारा पाहून तिकडे निघून गेले. ते भुकेले नव्हते. ते गरीब नव्हते. ते अशिक्षित नव्हते. तरीही गेले. ते शुद्र प्रवृत्तीचे होते. ते समस्या आल्यावर पुन्हा महाराष्ट्र जागृत जनमंच कडे येतील. आम्ही त्यांना मदत करू. कारण तो आमचा धर्म आहे. शुद्ध आणि शुद्र असा भेदभाव न करता मदत करणे.

     समस्या ग्रस्त लोक आमचेकडे आल्यानंतर आम्ही मदत केली. समस्या निवारण झाल्यावर तो सोडून पळून गेला. हा तत्कालिक उपाय आहे. पण त्याच्या शुद्र विचारात बदल करून शुद्ध विचार पेरण्याचे काम आम्ही करीत आहोत. हा कायमस्वरूपी उपाय आहे.

     भगवान श्रीकृष्णाने पांडवांना युद्धात मदत करुन विजय मिळवून दिला. हा तात्पुरता उपाय होता. पुरेसा नव्हता. म्हणून कुरू क्षेत्रावरच अर्जुनाला ज्ञान दिले. ती गीता फक्त अर्जुन पुरती नव्हती तर संपूर्ण जगाला उद्बोधक आहे. आजही आपण ती वाचतो. नाही वाचता आली तर ऐकतो.

     असाच प्रयत्न आम्ही महाराष्ट्र जागृत जनमंच करीत आहोत. ज्या वाटेने सज्जन माणूस गेला ती आमची वाट. तोच आमचा धर्म. ते अनुसरून आमचे कर्म.

     काही लोकांना असे शुद्ध धर्म, शुद्ध कर्म आवडत नाहीत. कारण त्यांच्या दुष्ट हितसंबधात बाधा येते. म्हणून ते द्वेष करतात. गांधीजींचा खून करणे, ही अद्यावत घटना याची साक्ष देते. दाभोळकरांचा खून करणे, ही अद्यावत घटना याची साक्ष देते. दुष्ट लोक सृष्ट लोकांना नष्ट करण्याचा प्रयत्न प्रत्येक काळात, युगात करीत असतात. जरी नष्ट केले तरीही राम, कृष्ण, बुद्ध, गांधी जन्माला येणे थांबत नाहीत. हिवर, खैर, बाभुळच्या वनात आंबा उगवतोच.

✒️शिवराम पाटील(महाराष्ट्र जागृत जनमंच)मो:-९२७०९६३१२२