गर्व से बोलो, हम सब एक हिंदु है!

209

 

भारत हा कृषिप्रधान देश होता, आता आहे की नाही हे सांगता येत नाही. तेव्हा शाळा कॉलेज मध्ये तसे शिकविल्या जात होते. आज राज्यात देशात शाळा कॉलेज खूप झालेत. तिथे विद्यार्थी आणि विद्यार्थिनीच्या पालकाचे प्रथम आर्थिक शोषण होते, नंतर विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण होते. ते लैंगिक शोषण करणारा कधी शिपाई कधी शिक्षक कधी संचालक असतो. शाळा कॉलेज मधील मूल, मुली देवाघरची फुले राहिली नाही. कारण फुलांना जात धर्म, पंथ राज्य नसते. शाळा कॉलेज मध्ये अनेक प्रकारची मूल-मुली येतात. त्यांना सांविधानिक मुल्यावर आधारीत शिक्षण देऊन जागरूक नागरिक बनविणे हे शिक्षकाचे काम असते. जय प्रमाणे बगीच्यात अनेक प्रकारच्या जातीचे फुले फळे येतात. ते जात धर्म विसरून सर्वांना सारखा सुगंध आणि स्वाद देतात. त्यांना जाती धर्माचे लेबर लावणारे व्यापारी आम्हाला नको आहेत. त्या पेक्षा त्या फुलांना फळांना चांगल्या प्रकारे देखभाल करून त्याच्या सुगंधात सुंदरता आणि स्वाद मध्ये मिठास भरणारे माळी आम्हाला हवे आहेत. आपल्या देशात चंद्र हा हिंदूंना करवा चौथ ची परंपरा सांगतो, तोच चंद्र मुस्लिम समाजाला ईदची आठवण देतो. कारण त्याला हिंदू मुस्लिम समाजाची मत नको असतात. या देशातील जातीची एकच समस्या आहे की ते तोडायला आले तर आपण तुटले नाही पाहिजे म्हणजे जातीची समस्या दुर होईल. ज्या वृत्तपत्रांत द्वेष भावना भडकवण्याच्या बातम्या लेख प्रसिद्ध होतात ते वृत्तपत्र वाचणे सोडून द्यावी. ती आपोआप बंद पडतील. भारताची सर्वात मोठी ओळख आहे शांती आहे. अशांती करणाऱ्याकडे दुर्लक्ष केले की शांतीची रेषा मोठी होत जाते. पण तसे होतांना आता दिसत नाही. शाळेतच चिमुकलीचे लैंगिक शोषण होतांना उघड होते. ते पालक ओरड करतात. तेव्हा त्याला सर्व पालक पाठिंबा देण्यासाठी रस्त्यावर उतरतात, त्यावेळी ते जन आंदोलन होते. पोलिसांनी आरोपिला पकडून आंदोलन शांत करण्या ऐवजी राजकीय आशीर्वादाने लाटीचार्ज करून बळाचा वापर करतात.
शिक्षकांना व शाळा संचालकांना वाचविण्यासाठी त्याला राजकीय रंग दिला जातो. इथे सर्वच ‘गर्व से बोलो हम सब हिंदु है’ म्हणणारे असतात. मुस्लिम असते तर राज्यासह देशात प्रचंड जातीय दंगली घडविल्या गेल्या असत्या. त्यासाठी तीन टक्क्यावाल्याचे कट्टरपंथी मराठे, ओबीसी हिंदू आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी तयारच असतात. कारण तेच जास्त गर्व से बोलो हम सब हिंदु है म्हणतात.
मनुवादी राम राज्यात घडणाऱ्या घटना संविधान असणाऱ्या भारतात घडतांना दिसतात. महाराष्ट्र राज्याची राजधानी मुंबई तिच्या 67 किलोमीटर अंतरावर बदलापूर शहर आहे. तिथे आदर्श नसणाऱ्या विचारधारा मानणाऱ्या संचालकाची आदर्श शाळा आहे. त्या शाळेत चिमुकल्या मुलीचे लैंगिक शोषण झाल्याची घटना घडली होती. आरोपी अक्षय शिंदे यास पकडण्यात आले होते. पोलिसानी न्यायालयात प्रकरण सादर केले होते. तपास कोणत्या दिसेने जात आहे हे लक्षात येताच. शाळेचे CCTV फुटेज गायब करणे, ते फुटेज उडवणाऱ्या कर्मचाऱ्याला गायब करणे, सगळ्या शिक्षकांची, प्रिन्सिपलची तोंडं बंद करणे, संस्थेच्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांना गायब करणे, पोलीस स्टेशन मध्ये बारा तेरा तास पालकांची कम्प्लेंट रोखून धरणे, केस लिहून नं घेणे. सर्व मर्यादा सोडून सुरू होते. कारण इथे सर्वच गरीब, मध्यम, उच्च उत्पन्न गटातील हिंदू होते.
गर्व से बोलो हम सब एक हिंदु है म्हणणारे होते. तरी न्याय व्यवस्था प्रशासकीय व्यवस्था भारतीय संविधान की मनुवादी हिंदुत्व यात पूर्णपणे अडकली होती.
आदर्श शाळेतील चिमुकल्या मुलीचे लैंगिक शोषण हे सगळं फक्त शाळेच्या सफाई कर्मचाऱ्याने केलं असं कोणाला वाटत असेल आणि बरं झाले. अक्षय शिंदेचा एन्काऊंटर केला. असे कोणी म्हणून न्याय मिळालाच्या बोंबा मारत, टाळ्या वाजवत असतील तर अश्या गर्व से बोलो हम सब हिंदु है म्हणणाऱ्यांना नेमकं काय समजावून सांगावे? याचा विचार मी बरेच दिवस करतोय. कारण सोशल मिडियावर फेसबुकवर माझ्या लेखावर परखड प्रतिकिर्या व्यक्त करणारे काळ बदलला आपण बदलले पाहिजे. हिंदुवर टीका करू नका असा सल्ला देणाऱ्या मराठा मनसे सैनिक आणि भाजपाचे कट्टरपंती ओबीसी हिंदू भक्तांना डोळ्यासमोर ठेऊन मी या घटनेवर हा लेख लिहला.
मनुवादी विचारांचा कट्टर समर्थक असलेल्या शाळेच्या संस्था चालकांवर ‘चाईल्ड अब्युज पॉर्न’ असे गंभीर आरोप फाईल झालेले आहेत. याच घटनेच्या काही दिवसांपूर्वीच एक सहावीतील मुलगी शाळेतून बेपत्ता झालेली होती. किती निष्पाप चिमुरडे जीव यात भरडले गेले असतील याची कल्पना नाही. संस्थाचालक आणि राजकीय पक्ष यांचे घानिष्ठ संबंध असल्यामुळे स्थानिक रहिवाशी उघड बोलण्याची हिंमत करीत नाही. पण सत्य काही दिवस, महीने वर्ष लपवून ठेवता येते एक दिवस समोर आल्याशिवाय राहत नाही. अक्षय शिंदेला मारल्या नंतर हे सत्य आहे की गर्व से बोलो हम सब एक हिंदु है.
आरोपी अक्षय शिंदे याने पोलीस अधिकारी मीरा बोरवणकर यांच्याशी बोलायची विनंती केली होती. त्यावर पोलीस प्रशासनाने त्याला तसे आश्वासन सुद्धा दिले होते. मग मध्येच पोलिसांच्या गराड्यात असलेल्या हात बांधलेले आणि तोंडावर काळा कपडा असलेल्या अक्षयने म्हणे पोलिसांवर गोळी झाडली.त्याआधी बातमी आली होती की, अक्षयने स्वतःवर गोळी झाडली. अश्या वेळी खरंखोटं कधीच समोर येणार नाही यासाठी सर्वच म्हणतील गर्व से बोलो हम सब एक हिंदु है.
मिरा बोरवणकर यांना भेटून अक्षयकडून जे भयंकर खुलासे समोर आले असते ते यापुढे कधीच येणार नाहीत. एक खुप मोठं मानवी तस्करी आणि चाईल्ड पॉर्न याचे रॅकेट उघडं झाल असते, आता ते होणार नाही. अक्षयसारखा आरोपी संपवल्यामुळे यापुढे आपली लेकरं सुरक्षित झाली आहेत असे बहुसंख्य हिंदूंना वाटत असेल तर त्यांनी. राज्यातील देशातील हिंदूंच्या मंदिरात देवाच्या देवीच्या मूर्तीसमोर झालेले बलत्कार, खून, हत्या डोळ्या समोर ठेऊन अक्षय शिंदेचा ज्याप्रमाणे एन्काऊंटर झाला त्याच पद्धतीने त्यांचा निकाल न्याय का दिल्या जात नाही. जात धर्म आडवा येतो?. वर्ण जातव्यवस्था कशी प्रभावी काम करते हे यातून सिद्ध होते.कट्टरपंथी हिंदूने विशेष स्वताला सुवर्ण समजणाऱ्या मराठा तरुणानी ओबीसी तरुणानी याबाबत बोलले पाहिजे काय हे सर्व हिंदू नाहीत काय?.महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे च्या राज्यात, खासदार श्रीकांत शिंदे च्या कल्याण लोकसभा मतदार संघात,पोलिस दलातील संजय शिंदे या इन्स्पेक्टरने, बदलापूर घटनेचा आरोपी अक्षय शिंदे चा एन्काऊंटर केले.हा राम राज्याची स्थापना करण्यात आल्याचा सबळ पुरावा म्हणावा लागेल. कारण वर्ण व्यवस्थेत व वर्ग व्यवस्थेत गरिबांचा बळी देण्याची परंपरा रीतिरिवाज आवश्यक असतो.मग आपला नंबर कधी कसा लागेल याचा विचार करावा लागेल. म्हणूनच विसरू नका गर्व से बोलो हम सब एक हिंदु है.

सागर रामभाऊ तायडे 9920403859,भांडुप,मुंबई.