धम्म हे संस्काराचे केंद्र आहे – प्रोफेसर डॉ.अनिल काळबांडे

    211

     

    ✒️ सिध्दार्थ दिवेकर (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) मो.9823995466

    उमरखेड : – (दि 10 जून) तथागत बुद्धाने दिलेला बौद्ध धम्म हा मानवी मूल्य नीतिमत्ता जोपासणारा असून संपूर्ण मानवी कल्याणाचे तत्त्वज्ञान या धम्मामध्ये आहे या धम्माच्या आचरणाने मनुष्य दुःखमुक्त होऊन सुखाने जीवन जगू लागतो त्यामुळे बौद्ध धम्म हेच सर्वात प्रभावी संस्काराचे केंद्र असल्याचे प्रतिपादन प्रख्यात आंबेडकरी विचारवंत प्रोफेसर डॉ. अनिल काळबांडे यांनी केले.
    ते तालुक्यातील मौजे हरदडा येथे आयोजित पहिल्या बौद्ध धम्म परिषदेमध्ये प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
    या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जेष्ठ समाजसुधारक चिमणाजी काळबांडे हे होते.

    तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार विजयराव खडसे, श्रीकांत बनसोड, माजी जि प सदस्य रामराव गायकवाड, रुग्णसेवक भाविक भगत, अभिजीत पाईकराव, पत्रकार दत्तराव काळे,प्रसिद्ध विधीतज्ञ डी .एफ हरदडकर ‘ , लक्ष्मण धुळे, सिद्धार्थ बरडे, पत्रकार सिद्धार्थ दिवेकर, कैलास घुगरे इत्यादी अनेक मान्यवर उपस्थित होते.

    सुरुवातीला सकाळच्या सत्रात मध्ये पूजनीय भदंत कीर्तीबोधी व भंते पट्टीसेन यांच्या हस्ते त्रिशरण पंचशील घेऊन या धम्म परिषदेची सुरुवात झाली.

    सायंकाळच्या प्रबोधनाच्या सत्रात माजी आमदार विजयराव खडसे यांनी समाजाने एक होऊन धम्माच्या मार्गाने चालावे व आपला विकास करून घेण्याचा त्यांनी संदेश दिला. तर रामराव गायकवाड यांनी बुद्ध धम्म हाच एकमेव आपल्या विकासाचा पर्याय असल्याचे प्रतिपादन केले.

    तर रुग्णसेवक भाविक भगत यांनी , धम्माच्या आणि विनयाने जीवनाचे सोने होते म्हणूनच आपल्यासारख्या गावकुसाबाहेर राहणाऱ्या माणसाला बाबासाहेबांनी बौद्ध धम्माच्या ओटी टाकले तर ज्येष्ठविधीतज्ञ हरडफकर यांनी बाबासाहेबांच्या जीवनातील प्रसंग सांगून आपण सुद्धा त्याचा आचरण करावे असे प्रतिपादन केले .पुढे बोलताना डॉ . काळबांडे म्हणाले की, समाजाने एकसंघ होऊन पुढे येणारे आव्हाने पेलावे लागतील त्यासाठीच डॉ .बाबासाहेब आंबेडकरांनी विश्वातील सर्वात मोठा व मानवाच्या सर्वांगीण विकासाचा असणारा कल्याणकारी बौद्ध धम्म दिला.

    सम्राट अशोका सारखा देवाने प्रिय चक्रवती राजा दिला त्याच बरोबर शिक्षण आणि भारतीय संविधान दिले या त्रिसूत्रीमुळे आपल्या जीवनाचा सर्वांगीण विकासच होणार आहे त्यामुळे बौद्ध धम्माच्या पंचशीलाचे पालन करून आपण आपला विकास करावा असे प्रतिपादन केले.

    या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील कवडे व प्रा. गजानन दामोदर यांनी केले तर आभार सुधाकर कांबळे यांनी मानले.

    या वेळी परिसरात बौद्ध धम्मपरिषदेचे कार्यकरणार्या मान्यवरांचा स्मृती चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

    या कार्यक्रमाचे आयोजन प्रणिताताई कांबळे, गौतम कांबळे यांच्या नेतृत्वाखाली सर्व सहकाऱ्यांनी केले.

    रात्रीला भीम शाहीर दिनकर लोणकर व आशा सरपे यांच्या भीम गीतांच्या सामन्याने या कार्यक्रमाची सांगता झाली.