शब्दगंध च्या वतीने पुरस्कारासाठी पुस्तकं पाठविण्याचे आवाहन

84

 

अहमदनगर : “ एप्रिल २०२३ ते आक्टोबर २०२४ दरम्यान प्रकाशित झालेले कथासंग्रह,काव्यसंग्रह, आत्मचरित्र,लेखसंग्रह,कादंबरी,बालवाडमय ,संशोधन ग्रंथ,समीक्षा ग्रंथ च्या दोन प्रती राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य पुरस्कारासाठी पाठवाव्यात ” असे आवाहन शब्दगंध साहित्यिक परिषदेचे संस्थापक सचिव सुनील गोसावी व अध्यक्ष राजेंद्र उदागे यांनी केले आहे.
शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने नवोदित लेखक,कवींना प्रोत्साहन व प्रेरणा देण्यासाठी वर्षभर विविध साहित्यिक उपक्रम राबविण्यात येतात.त्यामध्ये कथाकथन,काव्यवाचन, परिसंवाद,चर्चासत्र,कथा-काव्य लेखन स्पर्धा,पुरस्कार वितरण,पुस्तक प्रकाशन, बालसंस्कार शिबीर इत्यादी उपक्रम राबविण्यात येतात.त्यानंतर वर्षातून एकदा सर्व सभासदांना एकत्र भेटता यावे यासाठी राज्यस्तरीय साहित्य संमेलन आयोजित करण्यात येते.यावर्षी “ सोळावे राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलन ” लवकरच आयोजित करण्यात येणार आहे.त्यासाठी पुस्तकं मागविण्यात येत असल्याची माहिती अध्यक्ष राजेंद्र उदागे यांनी दिली.
सन २०२३- २०२४ मध्ये प्रकाशित झालेल्या पुस्तकांच्या दोन प्रती,परिचय,पोस्टाची रु ५ ची ५ तिकिटे १५ नोव्हेंबर २०२४ पर्यंत शब्दगंध साहित्यिक परिषद,फुलोरा,लक्ष्मी कॉलनी,तपोवन रोड,सावेडी,अहमदनगर – ४१४००१ मो.९९२१००९७५० येथे पाठवावे असे आवाहन प्रा.डॉ.अशोक कानडे, सुभाष सोनवणे,भगवान राऊत,भारत गाडेकर,ज्ञानदेव पांडूळे,अजयकुमार पवार, बबनराव गिरी,राजेंद्र पवार,स्वाती ठूबे,शर्मिला गोसावी,प्रा.डॉ.तुकाराम गोंदकर,राजेंद्र फंड, प्राचार्य डॉ.गुंफा कोकाटे यांनी केले आहे.