✒️रोशन मदनकर(उप संपादक)
ब्रम्हापुरी(दि.17मार्च):- याच्या खांद्यावर सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्याची जवाबदारी सरकारने दिली असेल त्या प्रशासकीय अधिकाऱ्याने जर सामान्य जनतेकडे पाठ फिरवली तर सामान्य जनतेने काय करावं जगावं की, मरावं असा प्रश्न निर्माण होतो. असाच प्रश्न चोरटी गावातील शेतकऱ्यांना पडेला आहे.
ज्यांच्या शेती फक्त राजकीय लोक व अधिकाऱ्याच्या निसकाळजी पणामुळे शेतकऱ्याने करावं काय जगावं की मरावं एकच प्रश्न.. शेतकऱ्यांना पडू लागला आहे. वारंवार तहसीलदार, आणि उपविभागीय आधिकरी यांच्या कडे पाणी भरून सुद्धा शेतकऱ्याकडे लक्ष्य देऊन राहिले नाही फक्त राजकीय लोकांसारखे फक्त खोटे आश्वासन देत आहे.ज्यांची जमीन पडीत आहे त्यांनी मुला बाळाचा पोट कसा भरावा उदरनिर्वाह कसा करावा अश्यास प्रश्नात जीवन जगत आहे .एखादा दगडाला पाझर फुटेल,पण तहसीलदार, व उपविभागीय अधिकारी यांना शेतकऱ्या विषयी काहीच दयामाया नाही अन्न पिकवणारा मेला तरी काहीच फरक पडत नाही.
ज्या शेतीच्या पांदन रस्त्यावर अतिक्रमण करून 3 वर्षा पासून शेती पड्या आहे पण कोणताच अधिकारी फिरकुन सुद्धा पहिला नाही. आम्ही जेव्हा जातो तेव्हा तहसीलदार व उपविभागीय अधिकारी सांगतो की या हप्त्यात तुमच्या रस्त्यावरील अतिक्रमण हटावू पण यांना वडे्टीवार या भट्टा कडून योग्य तो पंचाग पाहून मुहूर्त काढण्यास विलंब होत आहे.ज्येव्हा वड्डेटीवार भट्ट योग्य मुहूर्त कडून देतील. तेव्हाच आतिक्रमित खड्डे बुजतील असे वाटते आहे. तो सोन्याचं दिवस कधी उगवणार याकडे, शेतकरी टक लावुन बघत आहेत.जिथे अधिकाऱ्यांना जनतेचे हितचिंतक म्हणून काम करायला पाहिजे होते तेथे राजकीय लोकांचे गुलाम म्हणून काम करू राहिले. देशाच्या संविधानाची शपथ जनतेची दिशाभूल करणारी काम ब्रह्मपुरी इथला प्रशासन करत आहे.
तहसिलदार व उपविभागीय अधिकारी यांना शेतकऱ्याकडून दहा बोटाची विनंती आहे,की,भट्टा कडून लवकरात लवकर मुहूर्त कडून अतिक्रमण हटवून द्यावे अन्यथा शेतकऱ्याच्या आत्महत्येस सर्वस्वी जबाबदार तुम्ही व मुहूर्त कडणारा भट्ट राहील.



