चिमुर : बौध्दगया महाबोथी महाविहार मुक्ती आंदोलन देशभर सुरु आहे. त्याच अभियानाचा भाग म्हणून आंदोलनास पाठींबा व बुध्दगया येथील महाबोथी महाविहार १९४९ च्या व्यवस्थापन कायदा तात्काळ रद्द करून महाबोधी महाविहाराचे संपुर्ण व्यवस्थापन हे बौध्दांच्या हाती देण्यात यावे. या मागणी करीता २० मार्च महाड क्रांती दिनाच्या निमित्ताने चिमूर येथील संविधान चौकातून तहसील कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
महाबोधी महाविहार १९४९ च्या व्यवस्थापन कायदा रद्द
करण्याच्या मागणीसाठी बौद्धगया येथे भिक्खु संघाचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनास देश विदेशातून मोठा पाठींबा मिळत आहे. याच्या समर्थनार्थ भिक्खु संघ संघारामगिरी, भारतीय बौध्द महासभा, समता सैनिक दल, बौध्दगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन समन्वय समिती तर्फ मोर्चाचे आयोजन केले आहे.
आंदोलनाचे नेतृत्व भदंत ज्ञानज्योती महाथेरो व भिख्खु संघ करणार असून सकाळी ११ वाजता संविधान चौक येथुन मोर्चा राष्ट्रिय महामार्गाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे बाबासाहेबांना अभिवादन केल्यानंतर
तहसील कार्यालयावर धडकणार आहे. यांनतर मोर्चाचे सभेत रूपांतर होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
या आंदोलनात बौध्द उपासक व उपासीकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन समिती अध्यक्ष विलास राऊत, शुभम मंडपे, प्रशांतकुमार देठे, प्रकाश मेश्राम, ऋषीकेश मोटघरे, आशिष खोब्रागडे, जगदिश मेश्राम, गोपी घुटके, राजीव अलोणे, आशिष मेश्राम, आशिष बोरकर, आकाश भगत, मनोज राऊत, अस्मीत रामटेके, डॉ. धम्मचेती, एन. आर. कांबळे, अॅड. भुपेश पाटील, अॅड. नितीन रामटेके, अॅड. जयदेव मुन, अॅड संजीवनी सातारडे, महेंद्र बारसागडे, किशोर घोनमोडे, लालाजी मेश्राम, शालिक थुल, गुलाब गणवीर, विनोद देठे, सिद्धार्थ चहांदे, सुरेश डांगे, हरी मेश्राम, प्रफुल खोब्रागडे, विशाल इंदोरकर, डा. बाळासाहेब बनसोड, दीपक पाटील, लिलेश्वर कोसे, उत्तम रामटेके, विनोद येसाबरे, विनोद सोरदे, अजय गजभिये, रणजित पाटील, प्रदीप मेश्राम, अमोल गजभिये यांचेसह चिमूर तालुक्यातील प्रत्येक गावातील भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, बौद्ध पंच कमेटी, महिला मंडळ यांनी केले.



