सांप्रत केंद्र सरकारने सरकारी संस्थाने खाजगी करण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे फक्त आरक्षित नव्हे अनारक्षित नोकऱ्या सुद्धा कमी झाल्या आहेत. नोकरी आणि कामधंदा नसलेल्या बेरोजगार तरूणांना राजकीय नेते पक्षाचा प्रचार, मोर्चा, अवैध धंदे यात कामाला जुंपत आहेत.हा प्रकार फक्त बीड परभणीपुरता नव्हे जळगावला सुद्धा फोफावत आहे. प्रत्येक आमदार खासदार मंत्री कडे अशी बेरोजगार तरूणांची फौज काम करते.काही रेतीची चोरी करतात. रात्री बेरात्री रेती भरतात, वाहातात. आमदार खासदार मंत्री तिच रेती कलेक्टर आणि एसपीच्या सहकार्याने मागणी तेथे पुरवठा करतात. जळगांव जिल्ह्यातील रेतीचा लिलाव झालेला नसतांना तब्बल दोनशे डंपर खुलेआम रेती ट्रान्सपोर्ट करीत आहेत. शहरात चक्क सत्तर ऐंशीच्या स्पीडने धावत आहेत. जेथे वीसची स्पीड लिमीट आहे. प्रत्येक जिल्ह्यात मुंडे आणि कऱ्हाड आहेत. त्यांची आडनावे वेगळी आहेत. कार्यपद्धती सारखीच आहे.
वर्षभरातून बारा उत्सव येतात.यात बारा महिने तरूणांना रोजंदारीवर राबवले जाते. पिऊ खाऊ घालून राबवले जाते. दारू पाजून नाचवले जाते. त्यामुळे तरूणांना नोकरी आणि कामधंदा करण्याची गरज उरली नाही.
नियमित काम नाही. मजूरीची हमी नाही. म्हणून तरूणांचे लग्न होत नाही. शहरातील ३० टक्के तरूण ३५ चे होऊनही लग्न होत नाही. त्यामुळे पळवापळवी आणि बलात्काराचे प्रमाण वाढलेले आहे.
या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्याऐवजी राजकीय धुरंधर पक्ष आणि कलंदर नेते नव नवीन क्लृप्ती शोधून प्रस्तृत करीत आहेत. आजचा मुद्दा आहे औरंगजेब. हा विषय इतका रंगवला कि, तरूणांना हाच प्रश्न मोठा वाटू लागलेला आहे. त्यात काही बिनडोक लोकांनी भर घातली आहे. जो कधी शाळेत गेला नाही, ज्याने कधी पुस्तक वाचले नाही, तो सुद्धा औरंगजेब या समस्येने ग्रस्त झाला आहे.ती सोडवण्यासाठी व्यस्त झालेला आहे. संपुर्ण महाराष्ट्र आणि विधानसभा त्यात व्यस्त झाली आहे. अनेक चोर, दंगेखोर, हरामखोर आमदार सरकारमधे मंत्री आहेत. तरूणांची माथी भडकवण्याची, विधानसभा नासवण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवलेली आहे.
आजची समस्या औरंगजेब आहे का? सरकार मधील चोरांना चोरी करायची आहे. त्याकडे कोणीही लक्ष देऊ नये म्हणून असे विषय भुकंप, सुनामी सारखे प्रसार माध्यमांना पुरवले जात आहेत. महाराष्ट्रातील तरूणांना साडेतिनशे वर्षे भुतकाळात पाठवून औरंगजेबचा बदला घेण्यासाठी तयार केले जात आहे. कारण महाराष्ट्रातील खरी समस्या आणि ज्वलंत प्रश्न औरंगजेब बनलेला आहे. जणू काही औरंगजेब हाच विकासाच्या आड उभा आहे. धरण बांधताना आडवा येतो. रस्ता बनवतांना आडवा येतो. शाळा कॉलेज चालवतांना आडवा येतो. मोठी समस्या आहे. ज्वलंत प्रश्न आहे.
✒️शिवराम पाटील(महाराष्ट्र जागृत जनमंच)मो:-९२७०९६३१२२



