खर्डी जिल्हा परिषद शाळेत इयत्ता चौथीच्या मुलांना निरोप 

43

✒️पंढरपूर प्रतिनिधी(अमोल कुलकर्णी)

पंढरपूर(दि.23एप्रिल):-जिल्हा परिषद शाळा खर्डी तालुका पंढरपूर येथे येथील इयत्ता चौथी या वर्गातील मुलांचा निरोप समारंभ संपन्न झाला . या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ . प्रसाद प्रल्हाद कुलकर्णी उपस्थित होते .तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष समाधान रोंगे होते .

डॉ . कुलकर्णी यांनी मुलांना पुढील आयुष्यात आपले जीवन सुखकर होण्यासाठी काय केले पाहिजे तसेच जीवनात कोणत्या गोष्टींना महत्व दिले पाहिजे याची माहिती मुलांना दिली .

इयत्ता चौथी मधील सर्व मुलांनी शाळेसाठी दोन भिंतीवरील पंखे भेट देण्यात आले .तसेच शाळेचे सेवानिवृत्त झालेले शिक्षक श्री नवनाथ नागणे यांना संपूर्ण कपड्याचा आहेर देऊन त्यांना निरोप देण्यात आला .

यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष स्वाती गोरख पवार, केंद्रप्रमुख कल्याण कुंभार मुख्याध्यापक मच्छिंद्र जगदाळे ,भाग्यश्री अवधूत , महादेव पवार , भोसले सर उपस्थित होते .

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री बालाजी शिंदे यांनी केले . सूत्रसंचालन दादा खांडेकर यांनी तर आभार अशोक क्षीरसागर यांनी मानले .