महाविहार मुक्ती लढ्यात प्रत्यक्ष सहभागी होण्या करीता जळगाव येथून कार्यकर्ते रवाना 

52

✒️जळगाव(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

जळगाव(दि.23एप्रिल):- सम्राट अशोक यांनी उभारलेले महाबोधी महाविहार बौद्ध धर्मीयांच्या भावनांचे , आस्थेचे , पुजास्थळ असताना त्या ठिकाणी अन्य धर्मिय लोक विविध प्रकारची पूजा करतात , विहाराच्या प्रशासनात अधिकार गाजवतात , गौतम बुद्ध यांच्या विषयी विविध प्रकारची चुकीची माहिती देतात या व अन्य कारणांनी बौद्ध भिख्खू दिनांक १२ फेब्रुवारी पासून बुद्ध गया येथे आंदोलन करत आहेत . या आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी होण्या करिता जळगाव येथील विविध चळवळीत सक्रिय असलेले साहित्यिक , वकील , राजकीय पदाधिकारी आज २२ रोजी बुद्ध गया कड रवाना झालेत .

          यामध्ये जयसिंग वाघ , ॲड. आनंद कोचुरे , राजुभाई मोरे , बाबुराव वाघ , प्रा. डॉ. सत्यजित साळवे , डॉ. सी. यू. भालेराव , गायक शरद भालेराव , डी. झेड. मोरे , रंगकर्मी उदय सपकाळे , इतिहासाचे अभ्यासक सुभाष वाघ , प्रा. हरिश्चंद्र सोनवणे , दिलीप तासखेडकर, नथु अहिरे , अशोक सैंदाणे, प्रा. चंद्रशेखर अहिरराव , रामभाऊ शिरसाठ ई. कार्यकर्ते सामील आहेत .

        गया चे जिल्हाधिकारी तथा महाविहार संयोजन समितीचे अध्यक्ष यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना या बाबतच्या मागण्यांचे निवेदन देणार आहेत, या नंतर आंदोलन स्थळी सहभागी होणार , आंदोलनाची एकूण भूमिका समजून घेणार , मुख्य बौद्ध भिख्खू यांचेशी चर्चा करणार . 

          या आंदोलनाला पाठिंबा म्हणून जळगाव जिल्ह्यातील दहा हजार सह्यांचे निवेदन बिहारचे मुख्यमंत्री , राष्ट्रपती , प्रधानमंत्री , विरोधी पक्षनेते यांना पाठविले आहे . जिल्हाभर जनजागृती केली आहे . अशी माहिती साहित्यिक जयसिंग वाघ यांनी दिली .