मि.फडणवीस,…. तुम्ही सुद्धा!

208

जर सेनापती चोर असेल तर सैनिक सुद्धा चोरी करतात. प्रशासकिय अधिकारी का काम करीत नाहीत?त्यांना माहिती आहे, काहीच काम नाही केले तरीही आपले कोणीही बिघडवू शकत नाही.

असे का वाटते?

   कारण आपले आमदार, खासदार, मंत्री प्रत्येक निधीतून आपला वाटा मागून घेतात. हा इतका निधी देतो. मला यातील वीस टक्के, तीस टक्के, चाळीस टक्के, पन्नास टक्के काढून दे. बाकीचे तुम्ही काम करा अथवा नका करू. जमेल तितके आपसात वाटून घ्या.

    आमदार, खासदार, मंत्री स्वतः तिजोरीत हात घालून पैसा चोरू शकत नाही. ते निधीचा प्रस्ताव टाकतात. अर्थमंत्री आणि संबंधित खात्याचा मंत्री मंजूर करतो. इकडे संबंधित खात्याच्या अधिकारी व अभियंता ला सुचना देतात. मी इतका निधी मंजूर केला आहे. एस्टीमेट असे बनवा कि मला इतके टक्के मिळाले पाहिजे. तुम्ही पण काढून घ्या.

   अशी सुचना मिळाली कि तो अधिकारी किंवा अभियंता कामाला लागतो. जेथे आधीच पाणीपुरवठा सुरळीत चालू आहे तेथेच नवीन पाणीपुरवठा योजना बनवतो. आधीची योजना बिघडली, बंद पडली असा अहवाल बनवतो. पाणी पुरवठा बाबत उपभोक्ता नागरिकांच्या तक्रारी असतातच. पुरावा म्हणून. कोणीतरी सोम्या गोम्या किंवा नेत्यांच्या ड्रायव्हर, पीए, चमचा ला ठेका देतो. कागदी घोडे कागदी रथाला जुंपले जातात. योजना जुनीच पण तिला नवीन केली असे रंगवले जाते. अशा अनेक योजना आम्ही धरणगाव,पाचोरा तालुक्यात शोधून उघड केल्या आहेत.

    असाच अद्भुत प्रकार रस्ता बाबत केला जातो. धरणगांव तालुक्यातील साळवा ते नांदेड रस्ता ६२ लाखाला नवीन डांबरीकरण चा ठेका अभियंता ए जे पाटील याने दिला होता. तो रस्ता पुर्ण डांबरीकरण होत नाही तोच त्याची दुरूस्ती म्हणून चार कोटी मंजूर केले. गुलाबराव ने बोर्ड लावून नारळ फोडले. जे सोबत होते, त्यांना त्या नारळाचा प्रसाद मिळतो.दुरूस्तीला इतकी रक्कम का? दुरूस्ती ला ऑडिट नसते. जसे संरक्षण खर्चाला ऑडिट नसते. आम्ही त्या चोर अभियंता ला धारेवर धरले तेंव्हा त्याने गुलाबरावला फोन केला.”भाऊ काय करू?” उत्तर मिळाले, “ऑफिस ताबडतोब बंद करून निघून जा.”

     धरणगाव ते महांकाळ रस्ता बनवलाच नाही. तरीही देवकर ने त्याचे चाळीस लाख लाटून घेतले केले होते. आम्ही त्या गावातील लोकांची मुलाखत घेतली. म्हणाले,”दादा ये रस्ता तो हमारे हयात में कभी बनाच नहीं. “मी म्हटले, “बापू, ये रस्ता तो देवकर ने बनाया, चालीस लाख खर्च किया, ऐसा छापकर चुनाव लढ रहा है.”

    तसेच धरणगाव येथील क्रिडा संकुल देवकर ने अर्धवट बांधून गाई म्हशींचे प्रणय क्रीडा संकुल बनवले आहे. वीस लाख खर्च आणि एक कोटी पाण्यात गेले.

   धरणगाव येथील बालकवी ठोंबरे यांचे स्मृती केंद्र असेच ३० लाखाचा चुराडा करून ६० लाख खिशात घातलेले आहेत. दहा वर्षे झाली पण धरणगाव च्या एकाही माणसाला ते कळलेच नाही. गावठी आणि खिचडीचा उतारा गुणकारी ठरला. बालकवी ठोंबरेंशी सुद्धा गद्दारी!

    जळगाव मधे आमदार सुरेश भोळे यांनी असेच ठेके आपल्या नातेवाईकांना देऊन ठेवलेत. देशी, विदेशी पिऊन कोणीही शुद्धीवर येऊ नये. पुरूषांना देशीचा रतीब आणि महिलांना साडी, भांडी. चोर सुद्धा चोरी करतांना खिडकीतून गुंगीचे औषध टाकतात.

    काल परवा आमदार भोळे सार्वजनिक बांधकाम अभियंता पाटील वर खेकसले.म्हणे” रस्ता बनवा. आम्हाला लोक प्रश्न विचारतात. उत्तर द्यायला लाज वाटते.”

मी अभियंता असतो तर तेथेच उत्तर दिले असते.” कमीशन घेतांना लाज वाटत नाही, आणि आता कसली लाज?”

    जळगाव मधील डॉक्टर,वकील, इंजिनिअर, प्रोफेसर, व्यापारी, उद्योजक यांना काहीतरी कारणे वेठीस धरून मुके बहिरे करून ठेवले आहे. आपण थट्टेने अंध भक्त म्हणतो. बिचारे खूप दुखी होतात. ते अंधभक्त नाहीत, सरकारच्या नजरकैदेत आहेत. जसे नेताजी सुभाषचंद्र बोस इंग्रजांच्या नजरकैदेत होते. पण ते निसटले. हे येथले अजूनही निसटत नाहीत. यांची गोधळी अडकलेली आहे. गोधळी सोडून निसटून जायला त्याग बुद्धी लागते.

     गुलामांना आधी बेडी, हातकडी, साखळी ने बांधत असत. आता नजरकैदेत ठेवले जाते. “जास्त ताठ चालायचे नाही. गाठ आमच्याशी आहे. सत्तर हजार कोटीची फाईल ओपन करू शकतो. क्लीनचीट कंडीशनल आहे.”

     चोरांच्या मंडपात जेवून आलेली माणसे कितीही बुद्धिमान, उच्चशिक्षित असली तरीही ते ताठ मानेने बोलू शकत नाहीत. आजच्या राजकीय भ्रष्टाचाराचे हे सर्वात मोठे कारण आहे. फक्त शिंदे, पवारांना दोष देणे पुरेसे नाही. ते खानदानी मराठा आहेत. जातीवंत आहेत. पण फडणवीस साहेब, मुंजेला सुद्धा भ्रष्टाचार स्तोत्र म्हटले जाते का?

✒️शिवराम पाटील(महाराष्ट्र जागृत जनमंच)मो:-९२७०९६३१२२