बारावीच्या परीक्षेत ग्रामगीता महाविद्यालय चिमुरचा उत्कृष्ट निकाल

59

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमुर(दि.6मे):- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, सेमाना विद्या व वनविकास प्रशिक्षण मंडळ, गडचिरोली द्वारा संचालित ग्रामगीता कनिष्ठ महाविद्यालय, चिमुरने यंदाही आपली उज्वल यशपरंपरा कायम राखत उल्लेखनीय निकालाची नोंद केली आहे.

महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेचा निकाल ९७.४५ टक्के लागला असून, या यशामध्ये मिनाज खान हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे. तिच्यानंतर प्रीतम सुपारे याने दुसरा क्रमांक प्राप्त केला आहे.

कला शाखेमध्येही विद्यार्थ्यांनी उज्वल कामगिरी केली असून, कु. पल्लवी गजभे हीने प्रथम क्रमांक मिळवला आहे, तर सुबोध शंभरकर याने द्वितीय क्रमांक मिळवून यश संपादन केले आहे.

या यशाचे श्रेय विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुनंदा आस्वले, सर्व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापकवृंद आणि त्यांच्या पालकांना दिले आहे. प्राचार्या डॉ. आस्वले आणि सर्व प्राध्यापकांनी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून, त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

ग्रामगीता कनिष्ठ महाविद्यालयाचा हा सातत्याने मिळणारा शंभर टक्क्याच्या जवळपासचा निकाल शिक्षण क्षेत्रात संस्थेच्या गुणवत्तेची साक्ष देणारा ठरत आहे.