खासदार डॉ.नामदेव किरसान यांची थेट शेतकऱ्याच्या बांधावर भेट ; अवकाळी पावसामुळे नुकसान ग्रस्त शेतीची पाहणी

65

✒️रोशन मदनकर(उप संपादक) 

गडचिरोली(दि.6मे):-मागील काही दिवसात जिल्ह्यात सुरू असलेल्या वादळी वारा, अवकाळी पाऊस व गारपीटमुळे शेतकऱ्यांच्या उन्हाळी धान व मका पिकाला जोरदार फटका बसलेला असल्याने गडचिरोली चिमुर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी चामोर्शी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतात जावून नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली.

  वैनगंगा नदी काठावरील कुनघाडा, फराडा परिसरात अनेक शेतकरी उन्हाळी सिंचनाची सोय असल्याने धान व मका पिकाचे लागवड करीत असतात. परंतु सतत दोन- तीन दिवस  पडणाऱ्या वादळी वारा व गारपीटमुळे मुळे शेतकऱ्यांचे तोंडातील  घास गेलेले आहे. ऐन कापणी व मळणीला आलेला धानपिकाची मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अनेक शेतकरी यांनी बँकेकडून कर्ज घेवून उन्हाळी धानाची लागवड केलेली होती..बँकेचे कर्जे कसे फेडायचे या चिंतेत शेतकरी आहे.

    अशातच गडचिरोली- चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डाँ.नामदेव किरसान यांनी चामोर्शी तालुक्यातील कुणघाडा, फराडा परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीत जावून पाहणी करून त्याचा पाठपुरावा शासनाकडे करणार व नुकसान भरपाई मिळण्यासाठी प्रयत्न करणार अशी ग्वाही दिली.

         यावेळी जि.प. माजी उपाध्यक्ष मनोहर पाटील पोरेटी, तालुका काँगेस कमेटीचे अध्यक्ष प्रमोद भगत, अनुसूचित जाती सेल अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, जिल्हा उपाध्यक्ष अनिल कोठारे, पर्यावरण सेल अध्यक्ष राजेश ठाकूर, अविनाश चलाख, सरपंच सुदर्शन हजारे, उपसरपंच नुमचंद भिवणकर, आशिष मशाखेत्री, आशिष घेर, कुणाल आभारे, राणी देशमुख, चंपत उंदिरवाडे, योगराज मडावी, विजय लाड, पांडुरंग टिकले, अशोक वासेकर, दीपक भांडेकर, दशरथ नैताम, अतुल भांडेकर, गणेश दूधबळे, घनश्याम भांडेकर, बारीकराव सुरजगाडे, रमेश कोठारे, साहिल वडेट्टीवार, गणेश सुरजागडे, हरिश्चंद्र सुरजागडे, दादाजी दूधबळे, सुधीर गीरीसावडे सह नुकसान ग्रस्त शेतकरी, संबिधित विभागातील अधिकारी यावेळी उपस्थित होते.