✒️रोशन मदनकर(उप संपादक)
नागभीड(दि.6मे):- तालुक्यातील सतत पडणाऱ्या वादळी पावसामुळे व गारपीटमुळे शेतकऱ्यांच्या उन्हाळी धान पिकाला जोरदार फटका बसलेला आहे. आज गडचिरोली चिमुर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी अनेक शेतकऱ्यांच्या शेतात जावून पाहणी केली.
गंगासागर हेटी, आकापूर,उश्राळमेंढा,वाढोणा,व तळोधी परिसरात अनेक शेतकरी उन्हाळी सिंचनाची सोय असल्याने धान पिकाचे लागवड करीत असतात. परंतु सतत दोन- तीन दिवस पडणाऱ्या वादळी वारा व गारपीटमुळे मुळे शेतकऱ्यांचे तोंडातील घास गेलेले आहे.ऐन कापणी व मळणीला आलेला धानपिकाची मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अनेक शेतकरी यांनी बँकेकडून कर्ज घेवून उन्हाळी धानाची लागवड केलेली होती..बँकेचे कर्जे कसे फेडायचे या चिंतेत शेतकरी आहे.
अशातच गडचिरोली- चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डाँ.नामदेव किरसान यांनी तळोधी परीसरात शेतकऱ्यांच्या शेतीत जावून पाहणी करून त्याचा पाठपुरावा शासनाकडे करणार व नुकसान भरपाई मिळण्यासाठी प्रयत्न करणार अशी ग्वाही दिली.
यावेळी तालुका काँगेस कमेटीचे अध्यक्ष प्रमोदजी चौधरी, काँग्रेस नेते विनोदजी बोरकर, माजी जि.प.सद्स्य खोजरामजी मरस्कोल्हे, वाढोणा सरपंच देवेंद्रजी गेडाम, दिलीप पाटील गायकवाड, टिकेश्वर मस्के, कैलास अमृतकर, लुकेश निमगडे ,विलासजी भाकरे, प्रदीपजी येसनसुरे, अनिलजी डोर्लीकर, राजू देवानंद डोरलीकर, रवी लोंढे, बन्सोड, कैलास अम्रुतकर, साईनाथ डोंगरवार, लुकेश निमगडे, बळीराम गायकवाड, सौरभ नैताम, जगदिश ठवरे, कुषी अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी, सरपंच, व गारपीट ग्रस्त शेतकरी उपस्थित होते.



