तरूणांचा हैदोष आणि तरूणी सदोष!

144

आमदार म्हणजे विधायक. विधानसभेत जाऊन कायदे बनवणे, बदल करणे, रद्द करणे यासाठी निवडून देतो. तो चार लाखांचा प्रतिनिधी असतो. म्हणजे चार लाखात सरस, सज्जन, सुसंस्कृत असला पाहिजे. पण आज तर उलटेच वास्तव आहे. जो अधिकतम गुंड, गुन्हेगार, चोर, दारूडा, बाईलवेडा असतो तोच आमदार बनतो. लोक मत देऊन, सहमती देऊन त्याला निवडून देतात. शिरसाट ला लोकांनी पसंत केले. निवडून दिले. गोरे ला, धनंजय ला, सावंत ला, गुलाबराव ला, महाजनला लोकांनी पसंत केले. निवडून दिले. म्हणजे जे हवे होते ते विधानसभेत पाठवले. तर ते त्यांच्या सवयीनुसार, गुणवत्तेनुसार काम करणारच. बिघडलेला माणूस आमदार निवडून आल्यानंतर सुधारणार का? शक्यच नाही. त्याला आरामाचे मानधन मिळते, हरामाची कमाई मिळते तर तो जास्त बिघडणार. वरून कोणी कानफटीत मारू नये, चप्पल मारू नये म्हणून पोलिस संरक्षण करतात. तर तो माजावर येणारच. अशा माजोरी बापाची औलाद सज्जन कशी निपजणार? हिरण्यकश्यपु राक्षसाच्या पोटी क्वचितच भक्त प्रल्हाद जन्माला येतो.

   असा आमदार जो आधीच अवलक्षणी आहे तोच देवेंद्र फडणवीस यांना जास्त आवडतो. फडणवीस त्यांना मंत्री बनवतात. अशाच भ्रष्टाचार विद्या विशारद आमदारांना फडणवीस ने मंत्री बनवले आहे. कालच भुजबळ यांना मंत्री बनवून फडणवीस यांनी आपल्या नितीमत्तेवर, धोरणावर शिक्कामोर्तब केलेले आहे. भटजी, गुरूजी यांचेही अधःपतन झालेले आहे. भटजी, गुरूजी भेटले कि आम्ही अडाणी माणसे, पाया लागू म्हणत असू. ते आशिर्वाद देत असत, कल्याण असो. पण आता पायाला गू म्हणतो. आम्हाला आशिर्वाद नको वाटतो. त्यातून सत्यानाश होऊ शकतो.

   फडणवीस यांचे सैराट मंत्री महाराष्ट्रात धुमाकूळ घालत आहेत. महिलांशी लफडे करीत आहेत. बाप शेर मुलगा सव्वाशेर! ते तर बेलगाम झाले आहेत. आम्ही कितीही पोरी पटवल्या आणि पेटवल्या, कितीही पोरी फिरवल्या आणि मिरवल्या, तर आमचा आमदार बाप आणि मुख्यमंत्री फडणवीस आहेतच वाचवणारे. तर मग कोणाला , कशाला जुमानतील?

   यात तरूणीची सुद्धा चूक आहे. जर हे आमदार आणि मंत्री चोरी करतात तर त्यांच्या मुलांशी का मैत्री करतात?का डेटींग करतात? का हॉटेलींग करतात? असे करतांना हेतू चांगला असू शकतो का? तो तपासला पाहिजे.

   जरी मुला मुलींनी लफडे केले. आणि कळले कि मला फसवले. तर ताबडतोब दूर झाले पाहिजे. पण नाही! तेथेही अब्रूचे आरोप करून लुटमार करणे हाच हेतू असतो. वीस पंचवीस वयातील तरूणींना जर चांगले वाईट कळत नसेल तर येथे ब्रम्हा विष्णू महेश येतील का? ट्युशन घेतील का? जर या कटकारस्थानात, दुष्ट कृत्यात आईबापाचा सहभाग असेल तर कोणताही देव आडवा येणार नाही.

       माणूस एकमेव सामाजिक प्राणी आहे. म्हणून कुटुंब व्यवस्था निर्माण केली आहे. मुले, मुली तरूण झाले कि विधीवत लग्न करून संसार करण्याची सुंदर व्यवस्था आहे. ती हजारो वर्षांपासून यशस्वी ठरलेली आहे. आता मात्र तरूण मुले अणि तरूण मुलींनी ती कुटुंब व्यवस्था मोडकळीस काढलेली आहे. कायमची एकच बायको नको आणि कायमचा एकच नवरा नको. असा स्वच्छंद विचार प्रबळ झालेला आहे. याची सुरूवात नाटक, तमाशा, जलसा, सिनेमा यातून झालेली आहे. या करमणूक करणाऱ्या मंडळीं आधी समाजाचे प्रतिबिंब कथानक, अभिनय, गाणे रूपात दाखवत असत.आता उलटे चक्र फिरत आहेत. कुटुंबातील बाया माणसे पोरं पोरी या सिनेमाचे अनुकरण करू लागली आहेत. नागडे उघडे राहाणे, तोकडे कपडे घालणे, लग्ना आधीच मौजमस्ती करणे, प्री वेडींग करणे, विचित्र, भिबित्स हावभाव करणे फॉरवर्ड कल्चर समजले जात आहे. खरेतर हेच बॅकवर्ड कल्चर आहे. माणसांनी गुराढोरांसारखे अनिर्बंध लैंगिक वर्तन करणे. यातून मार्ग शोधला. सभ्य, सज्जन माणसांनी कुटुंब व्यवस्था बनवली. जी कुटुंब व्यवस्था माणूस, महिला, मुले, मुली, वृद्ध आई बाप यांचेसाठी उपयुक्त ठरलेली आहे.

    अशी कुटुंब व्यवस्था आणि समाज व्यवस्था जर तरूण, तरूणींनी मोडकळीस काढली तर अफ्रिकेतील आदी मानव सारखे जगणे प्राप्त होईल. कोणीही कोणाच्याही अंगावर चढेल, कोणीही कोणालाही मारून भाजून खाईल.

       मुले मुली कोणताही काम धंदा नोकरी करीत असतील तरीही वयात आल्यानंतर त्यांचे लग्न करून कुटुंब बनवणे, संसार करणे हेच सर्वांच्या हिताचे आहे. तिच व्यवस्था भारतात टिकून होती. म्हणून मेरा भारत महान म्हणत होतो. जर कुटुंब व्यवस्था मोळकळीस काढली तर भारत महान राहाणार नाही.

✒️शिवराम पाटील(मो:-९२७०९६३२२)