नागपूर येथे संत कबीर जयंती दिनी राष्ट्रीय पुरस्काराने सत्यशोधक रघुनाथ ढोक झाले सन्मानित !!

34

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड /सातारा(दि.15जून):- क्रांतिकारी संत कबीर वाचनालय समिती , तर्फे क्रांतिकारी संत कबीर यांची 627 वी जयंती निमित राष्ट्रीय मेगा फेस्टीवल 2025 दि.11 जुन 2025 रोजी सकाळी 10 ते रात्री 9 पर्यंत कार्यक्रम चालले होते. प्रथम फुले आंबेडकर विचारधारा जयस्तंभ चौक कामठी ,येथील डॉ.बाबासाहेब यांच्या पुतळ्यास मान्यवरांचे हस्ते पुष्पहार घालून भव्य मिरवणूक समता दलाचा आखाडा , बँड,तलवार ,दांडपट्टा,काठी लाठी प्रात्यक्षिके करीत पुढे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास पुष्पहार घालून सिद्धार्थ बुद्ध विहार प्रांगणातमध्ये सत्यशोधक रघुनाथ ढोक यांचें महात्मा फुले वेशभूषेत मोठ्या दिमाखात जागोजागी जंगी स्वागत करीत आगमन झाले.

कार्यक्रमाचे.सुरुवातील गौतम बुद्ध ,संत कबीर,महात्मा फुले सावित्रीबाई फुले , डॉ.आंबेडकर, माता रमाई यांच्या फोटोला पुष्पहार घालून या कार्यक्रमाचे उद्घाटन सातारा चे डॉ.दिलीप नेवसे पाटील यांनी केले. ,पिपरी,पुणे चे माजी न्यायाधीश शिवदास महाजन आणि तेलगांनाचे जेष्ठ साहित्यिक कवी मधु बावलकर स्वागताध्यक्ष म्हणून उपस्थित राहिले होते.

या मेगा फेस्टिवल मध्ये संत कबीर राष्ट्रीय पुरस्कार सत्यशोधक चळवळ महाराष्ट्र आणि इतर राज्यात पोहचविणारे फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अंड सोशल फौंडेशन चे संस्थापक अध्यक्ष व महात्मा फुले चरित्र साधने साहित्य व प्रकाशन समिती महाराष्ट्र शासनचे सदश्य लेखक व प्रकाशक सत्यशोधक रघुनाथ ढोक यांचा व त्यांचे सोबत हैद्राबाद चे सिने सिंगर कलाकार मुरली थेल्लम,मुबई जेष्ठ साहित्यिक नागनाथ डोलारे , आदिलाबाद चे लेखक प्रा.सुकुमार पेटकुले, साहित्यिक कवी व समाजसेवक यवतमाळ चे प्रशांत वंजारे,रमेशबाबू वाघमारे (शाहीर) ,उ.प्रदेशचे अवधेशकुमार नंद, बी.डी.संगम, लोकेश कटारीया, तेलगांनाचे अशोक महोलकर ,एम.सायलू म्हैसेकर,हिंगोलीचे बबन मोरे ,नांदेडचे त्रीरत्नकुमार भवरे , चंद्रप्रकाश देगलूरकर, नागपूरचे रवी दलाल मुंबईचे सौ.रेखा कुऱ्हेकर यांचा सन्मान चिन्ह ,सन्मानपत्र,विशेष पेन पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.

याप्रसंगी सत्यशोधक रघुनाथ ढोक यांनी पुरस्कार मिळाला म्हणून मनोगतात आज पर्यंत गेली पाच वर्षात महाराष्ट्र व तेलगांना राज्यात एकूण 53 सत्यशोधक विवाह आणि 14 गृहप्रवेश /वास्तू सोहळे पार पाडलेचे सागून या आधुनिक काळात विवाहावर आर्थिक उधळपट्टी न करीता अंधश्रद्धा कर्मकांड मुहूर्त याला तिलांजली देऊन सर्वांनी सत्यशोधक पद्धतीने विवाह करावेत यामुळे आपोआप महापुरुषांचे विचार पुढे नेल्याचे व आत्मिक समाधान मिळेल असे देखील सांगितले.

याप्रसंगी गायत्री रामटेके ह्या मी सावित्री बोलते आणि कु.शीफा पवार हीने मी रमाई बोलते एकपात्री नाटक सादर करीत भीमगीतावर लावणी इतर नृत्य व सिनेकलाकर मुरली थेल्लम व सरिता टीमने देखील संत कबीर व बाबासाहेब यांचे वर गीते सादर केल्याने प्रबोधन व मनोरंजन तर झालेच सोबत प्रा .सुकुमार पेटकुले यांनी सोहळ्यास अनुरूप संत कबीर दोहे गायिली म्हणून सोहळ्याची रंगत देखील खूपच वाढली. कार्यक्रमाचे मुख्य आयोजक संस्थेचे अध्यक्ष प्रदीप फुलझेले यांनी प्रास्ताविक व सचिव नामदेव पखीड्डे यांनी आभार मानले व सूत्रसंचलन राजू मेश्राम तसेच सत्यशोधक रघुनाथ ढोक यांनी महात्मा फुले रचित सत्याचा अखंड गाउन समारोप केला. मोलाची मदत कबीर वाचनालय अभ्यासिकाचे मुलांना केली.