

✒️रोशन मदनकर(उप संपादक)
गडचिरोली(दि.9जुलै):-अहेरी तालुक्यातील शासकीय योजनांमध्ये भ्रष्टाचार आणि अनियमितता झाल्याचा आरोप माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक अजयभाऊ कंकडालवार यांनी जिल्हा परिषद कार्यालया समोर आज (बुधवारी) आमरण उपोषण सुरु केले आहे. याआधी, त्यांनी 30 जून रोजी मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांना निवेदन पाठवून प्रशासनाच्या दुर्लक्षावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती.
अजयभाऊ कंकडालवार यांच्या मते, अहेरी व भामरागड तालुक्यातील विविध योजनांमध्ये भ्रष्टाचाराच्या गळात सापडलेल्या असून, नागरिकांना अपेक्षित लाभ मिळालेले नाहीत. जलजीवन मिशन,अंगणवाडी भरती, पाणीपुरवठा यांसारख्या योजनांमध्ये निकृष्ट दर्जाचे पाईप आणि अपूर्ण कामे करून लाखो रुपयांचा बोजा खर्च केला गेला आहे. विशेष म्हणजे, काही ठिकाणी याच कामांचा दाखला अनेक यंत्रणांमार्फत आर्थिक गैरव्यवहारासाठी दिला जात आहे.
भामरागड तालुक्यातील विकासकामांमध्येही गंभीर त्रुटी आढळल्या असून, अनेक कामे केवळ कागदावर अस्तित्वात आहेत, आणि फलकांवर केवळ औपचारिकता पूर्ण केली गेली आहे. त्यावर अजयभाऊ कंकडालवार यांनी वेळोवेळी चौकशीची मागणी केली होती, परंतु प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केली नाही. याच कारणास्तव त्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे.
त्यांच्या उपोषणास खासदार नामदेवराव किरसन साहेब व काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष महेंद्भाऊ ब्राह्मणवाडे यांनी भेट देऊन सार्वजनिक पाठिंबा दिला.यावेळी काँग्रेस,भाजप आणि इतर सामाजिक कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.
सर्वानुमते,अजयभाऊ कंकडालवार यांच्या आंदोलनाचे समर्थन करत प्रशासनाला या योजनांमधील भ्रष्टाचाराच्या कारवाईसाठी कडक पाऊले उचलण्याचा इशारा देण्यात आला आहे.
अजयभाऊ यांच्या उपोषणाला हणमंतु मडावी (आदिवासी सेल, काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष गडचिरोली), अजय नैताम (माजी जी.प.सदस्य), प्रशांत गोडसेलवार (नगर सेवक अहेरी), कार्तिक भाऊ तोगम (माजी उप सरपंच), आणि अनेक कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून जोरदार पाठिंबा दिला.
उपोषणाच्या माध्यमातून अजयभाऊ कंकडालवार प्रशासनावर दबाव आणून शासकीय योजनांच्या अनियमिततेचे प्रकरण उजागर करण्याचा प्रयत्न करत आहेत.



