अप्पर वर्धा धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या तात्काळ निकाली काढा — देवेंद्र भुयार 

59

▪️माजी आमदार देवेंद्र भुयार यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन ! 

✒️मोर्शी(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

मोर्शी(दि.24एप्रिल):-बळीराजा शेतकरी संघटना अमरावती प्रमाणे सरळ खरेदी केलेल्या शेतकऱ्यांना व महाराष्ट्र राज्यातील इतर प्रकल्पग्रस्त यांना योग्य मोबदला मिळाला त्याच प्रमाणे अप्पर वर्धा प्रकल्पग्रस्त यांना न्याय मिळऊन देण्यासाठी माजी आमदार देवेंद्र भुयार यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांना पत्र पाठऊन अप्पर वर्धा प्रकल्प ग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी केली आहे. 

   अप्पर वर्धा धरणग्रस्त (प्रकल्पग्रस्त)शेतकरी वर्धा जिल्हा व अमरावती जिल्ह्यातील मोर्शी -वरुड तालुक्यातील शेतकऱ्यांची फळबागातदार जमीन अप्पर वर्धा धरणासाठी १९८० साली जमीनीचे अधीग्रहण करण्यात आले होते. या दरम्यान, धरण तयार होऊन त्याचे पाणीही वापरणे सुरु झाले. मात्र, प्रमुख्याने संत्रा फळबागादार मुख्य पिक असून ज्यांच्या जमीनीवर हे धरण उभे झाले, त्या तत्कालीन शेतकऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांना अजूनही धरणग्रस्तांचे लाभ देण्यात देण्यात आलेले आहे. 

        १९६५ पासूनचा विदर्भातीलमोठ्या धरणांपैकी एक असलेल्या अप्पर वर्धा धरणाचा प्रवास १९६५ पासून सुरु झाला. नळ-दमयंती सागर नावाने प्रसिद्ध असून या धरणाला त्याच वर्षी राज्य शासनाची मान्यता मिळाली. १९७६ साली तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या हस्ते धरणाचे भूमीपूजन झाले. त्यानंतर १९८० साला पासून प्रत्यक्ष जमीनअधिग्रहण सुरु झाले. हे करताना प्रत्येक कुटुंबातील एकाला नोकरी देण्याची हमी देण्यात आली होती. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माहिती नुसार त्यापैकी १००७ प्रकल्पग्रस्तांना शासकीय निमशासकीय नोकरी समावून घेतले. परंतु इतर प्रकल्पाचे शेतकऱ्यांना मात्र,अद्यापही शासकीय- निमशासकीय लाभ मिळाला नाही. तसेच काहींना जमिनीचा मोबदला तुटपुजा मिळाला आहे. तसेच जमीन अधिग्रहण कायद्यानुसार शेतकऱ्यांना जमीन पेरणी साठी एक हेक्टर पर्यंत जमीन त्याच्या नावाने राहत्या घरापासून ८ किलोमीटरच्या अंतरापर्यंत कायद्याप्रमाणे देण्यात यावे अशी तरतूद असून सुद्धा त्यांना जमीन वेगवेगळे जिल्हा देण्यात आली होती.अप्पर वर्धा प्रकल्पग्रस्त हे भूमिहीन झाले तसेच अप्पर वर्धा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा उत्पन्नाचा साधन हरवल्याने शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या पूर्ण करण्यासाठी यासाठी अप्पर वर्धा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी लाभ मिळवण्यासाठी संबधित धरणग्रस्तांनी अनेकदा जिल्हा प्रशासनाकडे धाव घेतली, निवेदने दिली. मोठमोठी मोर्चा-सत्याग्रहही आंदोलने करून मंत्रालयीन बैठका सुद्धा झाल्या. परंतु, अद्याप नोकरी मिळाली नाही. नोकरी मिळणाऱ्या धरणग्रस्तांचा आकडा हजारावर पोहोचला आहे. यापैकी अनेकजण वेळोवेळी जिल्हािधकारी कार्यालयात पोहोचले. त्या-त्या जिल्हाधिकाऱ्यांशी त्यांनी संवादही साधला. परंतु, स्थायी उपाययोजना अजूनही झाली नसल्याची खंत माजी आमदार देवेंद्र भुयार यांनी व्यक्त केली.

   अप्पर वर्धा धरणग्रस्त शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी देऊन स्वतःचं मरण करून घेतलं आणि अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरण झाल्याने अमरावती जिल्ह्याचा प्रश्न नागरिकांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटला अमरावती जिल्हासुजलाम सुखलाम झाला तसेच शेतकऱ्यांच्या जमिनी पाण्याखाली आल्याने इतर शेतकरी हा सुखवला आहे. तसेच अप्पर वर्धा तयार झाल्याने औद्योगिक विकाससाठी व अमरावती जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी व प्रगती करण्यासाठी मोठा वाटा या अप्पर वर्धा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा आहे.माझ्या मोर्शी मतदारसंघातील अप्पर-वर्धा प्रकल्पग्रस्त शेतकरी असल्याने अनेक वेळा शासन दरबारी प्रश्न अधिवेशनाच्या माध्यमातून अप्पर वर्धा धरणग्रस्त शेतकऱ्यांचा प्रश्न देवेंद्र भुयार यांनी मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून अनेक वेळा सादर केला आहे. तरी सुद्धा अप्पर वर्धा धरणग्रस्त शेतकऱ्यांचे प्रश्न शासनाने दुर्लक्ष केले असून प्रकल्प ग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या निकाली न लागल्याने अप्पर वर्धा धरणग्रस्त आर्थिक दृष्ट्या खचला आहे त्यांना आर्थिक दृष्ट्या अधिक बळकट करण्यासाठी अप्पर वर्धा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे प्रमुख मागण्या निकाली काढण्यासाठी माजी आमदार देवेंद्र भुयार यांनी निकाली काढण्यासाठी, प्रकल्पग्रस्तांना एक्करी ३० लक्ष रुपये वाढीव मोबदला देण्यात यावा. प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र धारकांना शासकीय किंव्हा निमशासकीय नोकरीमध्ये सामावून घ्यावे. शासकीय नोकरी सामावून न घेतल्यास प्रमाणपत्र धारकास ३०लक्ष रुपये देण्यात यावे तसेच अप्पर वर्धा प्रकल्पग्रस्त नोकरी नोकरीचे वयोमर्यादा ४५ वय असल्याने एक रक्कमी ३० लक्ष रुपये देण्यात यावे, अप्पर वर्धा धरणग्रस्त शेतकऱ्यांना दोन हेक्टर पर्यंत जमीन देण्यात यावी. अप्पर वर्धा प्रकल्पग्रस्त यांचे आंदोलन दरम्यान ज्या शेतकऱ्यांनी जीवनाची यात्रा संपवली त्या शेतकऱ्यांना २५ लक्ष रुपये किंवा शैक्षणिक पात्रतेनुसार त्यांना पाल्याला शासकीय-निमशासकीय नोकरीमध्ये सामावून घेण्यात यावे. अप्पर वर्धा धरणग्रस्त शेतकऱ्यांना व्यवसाय करण्यासाठी ५० लक्ष रुपये पर्यंत कर्ज बिनव्याजी उपलब्ध करून देण्यात यावे यासह विविध मागण्या सोडविण्यासाठी माजी आमदार देवेंद्र भुयार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन अप्पर वर्धा धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या शेतकऱ्यांच्या भविष्याचा विचार करून तात्काळ निकाली काढण्यात याव्यात अशी मागणी माजी आमदार देवेंद्र भुयार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

मार्च २०२३ च्या अधिवेशनामध्ये मी अप्पर वर्धा प्रकल्प ग्रस्त शेतकऱ्यांचे विविध प्रश्न रेटून धरले होते त्यामध्ये प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी २० लक्ष रुपये सानुग्रह अनुदान देण्यात यावे व प्रकल्प ग्रस्तांच्या पाल्यांना शासकीय सेवेमध्ये समाविष्ट करण्यात यावे तसेच महसूल विभाग वन विभाग व धरामध्ये गेलेल्या शिक्कल जमिनी आहेत त्या प्रकल्प ग्रस्त शेतकऱ्यांना देण्यासाठी त्यांना न्याय मिळऊन देण्यासाठी माझी माझा लढा सुरू असून प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळाल्या शिवाय मी स्वस्थ बसणार नाही. — देवेंद्र भुयार माजी आमदार मोर्शी विधानसभा.