दहशतवाद, आतंकवाद, नक्षलवाद, माओवाद, उग्रवाद हे एकमेकांचे पर्यायवाची शब्द म्हणावे लागतील असे नाहीच तर ते आहेच. आणि कोणत्या न कोणत्या कारणाने याची प्रत्यक्ष अनुभूती सर्वांना आलेली च असणार पण ती जाणवत नाही. एखाद्या सशस्त्र हल्ला आणि हल्ल्यात मारल्या गेलेले लोक मारल्या गेलेले आतंकी लोक चे स्वरूप हे अत्यंत भयानक असते यात निष्पाप लोक मारल्या जात असतात पण हे असं का होत असावं? कोणी हे ठरवून करत असावं का? प्रत्येकाला आपल्या प्राणाची किंमत आहे जीव प्रिय आहेच मग हे आपला जीव धोक्यात घालून असे का करत आहेत? याची कारण मीमांसा झालीच पाहिजे अन्यथा कुणाचाच जीव हा काही फुकट येत नसतो तो मूल्यवान आहे आणि कुणालाच असे हल्ल्यात वैकुंठीचा प्रवास करने आवडणारे नाही.
अगदी गाँव खेड्यात आपण बघितले असता सामाजिक दहशतवाद,सांस्कृतिक दहशतवाद फार मोठ्या प्रमाणात आढळून येतो आहे आणि त्याचेवर अजून पण उपचार झालेला नाहीच.याचे कारण एखाद्या छोट्या किंवा सामाजिक दर्जा नसलेल्या जातीचा अधिकारी जरी असेल तरी त्याचे बाबतीत सामाजिक मत हे भिन्नच असते.समाज संख्येने मोठा जरी असला तरीही तो आपली संस्कृती विसरून बाकी संस्कृतीचा अंगीकार करतोय त्याला ते आवडत नाही पण उतरंड अशी आहे की त्याला ते स्वीकारणे भाग पडते यालाच सांस्कृतिक दहशतवाद असे म्हणावे लागेल.
शिक्षण क्षेत्रात सर्वच विद्यार्थी सारख्या बुद्धिमत्तेचे नसतात पण पेपर सारखाच असतो त्यामुळे एखाद्या विशेष विषयात प्रावीण्य प्राप्त असणारे विद्यार्थी निवड प्रक्रियेत बाद होतात यालाच शैक्षणिक दहशतवाद म्हणतात.यात फक्त सर्वांगीण विषयांचा अभ्यासक जो थोडा थोडा प्रावीण्य प्राप्त आहे असाच नमुना वजा विद्यार्थी पास होतो बाकी गळले जातात.पुन्हा एखाद्या व्यक्तीचे शिक्षण क्षेत्रात प्रभुत्व असणे त्याचे मता प्रमाणे कर्मचारी भरती होने,व्यवस्थापनाचे संचालन होने हे बाकी लोकांसाठी शैक्षणिक दहशतवादाचे च काम. आहे.ज्यात काही लोकांना पगार मिळतो पण ते गुलामीत जीवन कष्टत असतात.परीक्षेचा निकष हा व्यक्तिपरत्वे वेगळा असता तर प्रचंड जनसंख्या असणारा भारत देश अमेरिका आणि चायना पेक्षा समोर गेला असता पण तसे होत नाही.जसे की जंगलात वाघ,सिंह,हत्ती,हरीण,काळवीट, खार,घार,कबुतर,ससाणा,मासोळी,मगर यांना एकच परीक्षा ठेवली की उडून झाडावर बसायचे आहे त्यात फक्त कबुतर,घार आणि ससाणा च पास होईल बाकीचे नापास होतील.याची कारणं तपासली तर लक्षात येईल की प्रत्येकाचं कौशल्य वेगळं आहे.त्याच प्रमाणे प्रत्येक शाखेचा विद्यार्थी त्याच कौशल्य वेगळं असतं आणि परीक्षा पण त्याच पद्धतीच्या असायला पाहिजे होत्या त्या होत नाहीत शैक्षणिक दहशतवादाचा परिणाम सामाजिक आणि राष्ट्रीय बळकटी वर होतोच होतो.
इतिहास हा फार महत्वाचा आहे पण इतिहास लिहिणारे लोक ज्यांनी ध चां मां केला असेल तर त्याचा मात्र संदर्भ बदलत असतो.काल्पनिक गोष्टींनी भरलेली पुस्तके आणि त्यांचा संदर्भ घेऊन जर इतिहास हा असा च आहे असे म्हटले जात असेल तर तो समजदार लोकांसाठी डोकेदुखी च ठरत असतो ते इतिहासावर टीका करून त्याची चिरफाड करण्याचा तयारीत असतात .त्यामुळे मग काही लोकांच्या भावांना दुखावतात व इतिहासिक दहशतवाद जन्मास येतो. वा वी मिराशी,रसेल,स्मिथ,देशमुख,राजवाडे,कर्नल टॉड,जेम्स प्रिन्सेस असे अनेक प्रसिद्ध इतिहासकार झालेत त्यांनी भारताचा इतिहास समृद्ध केलेला आहे.त्यातल्या त्यात मध्य भारतात तर हिरालाल आणि आर वव्ही रसेल यांनी भरीव योगदान दिले संपूर्ण जाती,जमाती चा इतिहास लीपिबद्ध केलेला आहे.पंडित हिरालाल यांनी तरी शिलालेखांचे वाचन पण केलेले आहे.तरीही लोकांचे मनांत प्रचंड संभ्रम निर्माण होतेय भीती निर्माण होतेय त्यालाच इतिहासिक दहशतवाद असे म्हणावे लागेल.एखाद पात्र अनेक शतकांचे आधीच असते पण त्याचे विषयी समर्थक आणि विरोधक वर्तमान काळात सुद्धा एकमेकांचे समोर असे येतात की युद्ध जन्य परिस्थिती निर्माण होते आणि सरकारी प्रशासनावर तान निर्माण होतोय. उदाहरण घ्यायचे असल्यास औरंगाबाद/संभाजी नगर मधील मुघल सम्राट औरंगजेब कबरीचा मुद्दा ज्यामुळे कधी न कधी भावना अनावर आणून लोक विनाकारण वाद उकरू शकतात.
भारतात जंगल भरपूर होती पण सरकारने खनिज संपत्ती साठी ती विकली किंवा लिज वर दिली.त्यात स्थानिक लोकांना मात्र कवडी सुद्धा मिळाली नाही देशाचे प्रगतीसाठी आपल नैसर्गिक क्षेत्र सोडून लोक एखाद्या शहराचे बाजूला वसवल्या गेली व ती लोक बरबाद झाली याला प्रशासनिक दहशतवाद म्हणावे च लागेल कारण शासन आहे सरकार आहे व सरकारचा कंपन्यांना पाठिंबा आहे त्यामुळे कंपन्या मुजोर होऊन जंगल कापत आहेत शेतकरी व स्थानिक भूमिपुत्र बरबाद होत आहे आणि त्यावर दुसरी उपाय योजना पण नाही हे घातक आणि धक्कादायक ठरते आहे.छत्तीसगड मधील हसदेव जंगल,हैदराबादचे जंगल बेसुमार कापून टाकण्यात आले लोकांनी सोशल मिडिया वर मुद्दा लाऊन धरला त्यामुळे मग न्यायालयाने त्यात हस्तक्षेप केला आणि त्यावर थोड नियंत्रण आणलं. हसदेव जंगल पाच हजार एकर ने कापलं गेलं ते गेलंच अनेक प्राणी विस्थापित झाले तेथील हत्ती गडचिरोली जिल्ह्यात धुळघुस करू लागले परिणामी शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले.शेतकरी पिकास लहान मुलांप्रमाणे जतन करतो आणि ते पीक भरीस आल्यावर जर कुणी प्राणी अथवा मनुष्य त्याची नासाडी करेल तर त्याचा मनावर प्रचंड आघात होतोय तो आपण वर्णन सुद्धा करू शकत नाही.अर्थातच मानसिक भावना आतांकित होण्याचं काम होतेच होते.
भौगोलिक दहशतवाद हा येत्या काळात मोठा मुद्दा बनू शकतो.अनेक राज्यात कुठे खनिज आहे याची चाचपणी झाली आणि बऱ्याच जंगल क्षेत्र असणाऱ्या ठिकाणी खनिज मिळाली.अनेक कंपन्या ती खनिज काढण्यासाठी आता समोर आलेल्या आहेत आणि त्यासाठी बरीच जंगल कापल्या जातील.जी बातमी न्यूज चॅनेल वर फ्लॅश होते तीच लोकांना माहीत होते पण कुठेच जंगल कापल्या जात आहे हि बातमीच आली नाही तर ते जंगल साफ झाले तरी लोकांना काही घेणे देणे नसतेच कारण माहितीच मिळत नाही.यात गंमत अशी की जंगलात राहत असणाऱ्या अनेक आदिवासी लोकांकडे आधार कार्ड सुद्धा नाही अशी विदारक परिस्थिती आहे आणि मोबदल्याची वेळ येईल तेव्हा त्या लोकांना मोबदला मिळेल की नाही हाच मोठा प्रश्न निर्माण होतो.प्रती व्यक्तीस पांच ते दहा लाख रुपये कुटुंबास पाच एकर प्रमाणे जमीन असा काही तरी निकष लाऊन आदिवासी लोकांची गाव विस्थापित केल्या गेली.ज्या लोकांनी कधी दहा हजार रुपये बघितले नाही अशा लोकांना जर दहा लाख रु दिले तर ते लोक सुखी नाही तर बरबाद होतील हे निश्चित..आणि तसेच काही ठिकाणी झालेले आहे.उदाहरण घ्यायचे झाल्यास रान तलोधी नावाचे गाव पुनर्वसन झाले प्रत्येक लोकांना पैसा मिळाला लोक व्यसनी झाले.दारू आणि सट्टा मधे बरबाद झाले, दारू पिऊन पिऊन अनेक मेले.पैशाचा वापर कसा करायचा हे न कळल्याने अवाजवी खर्च करून कंगाल झाले भौगोलिक दहशतवादाने ते लोक नैसर्गिक जीवनातून निघून लोकांचे बाजारात बरबाद झाले असेच म्हणावे लागेल.कारण सामाजिक शिस्त आणि व्यवहाराचा संस्कार याचा अभाव असल्याने सगळं मुसळ केरात __
धर्म पंथ जात समुदाय हे मुद्दे पकडुन अहं पुढे आणून सुद्धा काही ठिकाणी दंगली झाल्या आहेत.किंवा मुद्दाम कोणता न कोणता मुद्दा दाबण्यासाठी पण प्रायोजित दंगली केल्या जातात.त्यालाच मग जातीय दंगल,धार्मिक दंगल असे स्वरूप प्राप्त होते व विनाकारण लोक मारल्या जातात.येणाऱ्या काळात कुणाचा केव्हा नंबर लागेल हे सांगता येत नाही कारण काळ च तसा आहे.त्यामुळे सामाजिक सौहार्द जपले पाहिजे अशी भूमिका सुशिक्षित आणि समजदार व्यक्तींची असली पाहिजे.खोट्या गोष्टी पसरवून लोक संख्या वाढविण्याचे काम करतात आणि त्याच गोष्टी मग समाजासाठी धोकादायक ठरत असतात.यामध्ये एखाद्या समाजाच्या महापुरुषांचे पुतळ्याची विटंबना असो की मग एखाद्या पवित्र ठिकाणी एखादी अपमानकारक असणारी वस्तू टाकून असो भावना भडकवण्याचा प्लॅन केला जातो.लोक आपली जात,आपला धर्म म्हणून एक मेकांवर तुटून पडतात यात काही वाचतात काही मरतात.वाचलेली पण जेल मध्ये जातात जिवंत माणसं मारली जातात अर्थातच नुकसान दोन्ही पक्षांचे होत असते.वर्तमानात काश्मीर मध्ये पहलगाम मधे आतंकवादी लोकांनी केलेला हल्ला पर्यटक लोकांवर केला त्यात अनेक राज्यातील लोक मारल्या गेली त्यात पर्यटक लोकांचा काहीच दोष नव्हता पण हल्ला करणारे लोक त्यांचे कटात यशस्वी झाले हि फार खेदाची बाब आहे.या हल्ल्यात एकूण सत्तावीस लोकांनी आपला जीव गमावला त्यात पंधरा लोक मुस्लिम समुदायाचे होते पण मिडिया वर बातम्या धार्मिक कलह निर्माण होईल अशाच होत्या.नाव विचारून गोळ्या मारण्यात आल्या अस भारतभर बातमी झाली पण नाव विचारून गोळ्या मारल्या असत्या तर पंधरा मुस्लिम लोक सुद्धा जीवास मुकले नसते असा प्रश्न साहजिकच पडतोय.असो..पण या गोष्टीत विनाकारण मनुष्यहानी होऊन लोक आतंकित होत असतात त्यामुळे याचेवर सरकार कडून कायम स्वरुपी उपाय योजना करने अत्यंत आवश्यक असेच आहे.धार्मिक दहशतवाद अत्यंत खतरनाक असतो तो लोकशाही देशात तर असू नये यासाठी योग्य पावले उचलली जावीत अशी अपेक्षा आहेच.आदिवासी क्षेत्रात ख्रिश्चन लोकांनी अनेक आदिवासी लोकांचे धर्मांतरण केले याच रागातून एका पाद्री स त्याचे कुटुंबासह जिवंत जाळून टाकण्याची घटना घडली होती हि सुद्धा तितकीच धक्कादायक होती.देशात अनेक धर्म आहेत प्रत्येकाला प्रत्येक धर्माचा अभिमान आहे व तो असायलाच पाहिजे पण अहं नसावा अहं त्यागून दिल्यास अशा घटना होणार नाहीत.परिणामी लोकांचे धर्मनिरपेक्ष समुपदेशन व्हायला हवे ज्यामुळे कुणाच्याच मनात कोणत्याही धर्माबद्दल तेढ निर्माण होणार नाही.
आपला देश लोकशाही प्रधान देश आहे.समाज शास्त्रज्ञ हेरॉल्ड लास्की म्हणतात की अनुचित बंधनाचा अभाव म्हणजेच स्वातंत्र्य__अर्थातच लोकांकडून लोकांसाठी लोकांद्वारे चालविण्यात आलेले राज्य पक्ष पद्धती आली राजेशाही संपली.पण एखाद्या पक्षाचे अनेक काळ सरकार असणे हे हुकूमशाही निर्माण होण्याचे द्योतक असते त्यामुळे लोकशाहीत कोणत्याही पक्षाचे सरकार असो पक्ष बदल आवश्यक असतो अन्यथा प्रत्येक महत्त्वाच्या क्षेत्रात आपल्या मर्जीतील लोक नेमून आपल्याच पक्षास कसा फायदा होईल असेच काम लोकशाहीत केल्या जातात.लोकशाहीत प्रशासनाचे काम आयएएस आय पी एस अधिकारी करीत असतात पण राजकीय वरदहस्त असणाऱ्या बाहुबली लोकांसमोर मात्र कलेक्टर आणि आय पी एस सुद्धा आपली शस्त्र म्यान करतांना दिसतात अर्थातच अधिकारी असून सुद्धा लोकांना न्याय देण्यासाठी ते यशस्वी होत नसतात हि विदारक स्थिती भारतीय लोकशाहीची होऊन गेलेली असेल तर सामान्य माणसाने मग न्याय मागायचा कुठे?भ्रष्टाचार प्रचंड वाढला आहे प्रत्येक ठिकाणी जर भ्रष्ट प्रवृत्ती चे लोक असतील तर सामान्य माणसासाठी न्याय हि दूरची गोष्ट होऊन जाते.आणि यातूनच सामान्य माणसं एकत्र येऊन त्यांचा उद्रेक होऊ शकतो हे नाकारता येत नाही.देशात असे होऊच नये म्हणून विविध कायदे केले जातात येत्या काळात भाषण देण्यास पण शासनाची परवानगी घ्यावी लागेल असे चित्र निर्माण होते आहे आणि यालाच प्रशासनिक दहशतवाद असे म्हणतात.लोकांना वाटत की शासनाद्वारे सगळ काही ठीक चालत आहे पण जनतेच्या अधिकारांची कुचंबणा होत आहे हे मात्र बघितल्या जात नाही फक्त नफा आणि फायदा हेच बघितल्या जाते.राजकीय पक्षांना निधी द्यायचा आणि आपल्याला हवे तसे कायदे करून घ्यायचे ,हवी ती जमीन मिळवून घ्यायची,हवी तो खान खनिज उत्खनन साठी घ्यायची हा एकाधिकार शाही प्रकार म्हणजेच लोकशाहीची प्रगल्भता नव्हेच.प्रत्येक क्षेत्रामध्ये मल्टी नेशनल कंपन्या आलेल्या आहेत आणि त्या अनेक कंपन्या सोबत भारतीय राजकीय लोकांचे संबंध आहेतच.
आज देशातील शेतकरी लोकांजवळ बियाणे राहिलेच नाही बियाणे असे लोक विकत आहेत की त्यांनी कधी शेतीच केली नाही. खत व्यवस्थापन यामध्ये खत भेसळ येत आहेत,औषधी भेसळ येत आहेत परिणामी भारतीय शेती विदेशी गुंतवणुकीसाठी बरबाद करण्यात येत आहे का?असा प्रश्न निर्माण होतोच आणि याला व्यावहारिक दहशतवाद असे संबोधावे लागेल.AI तंत्र विकसित होत आहे यामुळे अनेक नोकऱ्या येत्या सहा सात वर्षात जातात की काय अशी स्थिती निर्माण होते आहे परिणामी जिकडे तिकडे भय आणि अनिश्चिततेचे वातावरण तयार होने हे आतंकीत होनेच होय.
प्रशासकीय सेवेत काम करणारे अनेक लोक नकली प्रमाणपत्र बनवून सुद्धा नोकरी करतांना आढळले आहेत हे पारदर्शक राज्यव्यवस्थेत अपयशच म्हणावे लागेल.या मधे ज्याला जो हक्क मिळायला पाहिजे तो न मिळता इतर लोकच तो बळकावत असतात परिणामी सामाजिक असंतुलन निर्माण होते.येत्या काही वर्षात शेती क्षेत्रास महत्त्व येईल पण आमच्या शेतकरी लोकांकडे जमिनी राहणार नाही आणि राहिल्या तरी त्या ज्यादा उत्पन्न देणार नाही कारण रासायनिक खताचा भरमसाठ वापर आणि त्यात सुद्धा भेसळ अशी परिस्थिती निर्माण होते आहे.जे पाणी फुकट मिळत होत ते आता बॉटल मधे विकत घेऊन प्यावं लागत आहे हे दुर्दैव च आहे कारण पाणी पाजने पुण्याचं काम होत पण त्यात सुद्धा आता व्यवसाय झालेला आहे.आयुर्वेदिक उपचार हा कायम स्वरुपी बरा करतो पण तात्पुरता बर करणाऱ्या केमिकल चे औषधा कडे लोकांचा कल वाढलेला आहे त्यातल्या त्यात सुद्धा प्रचंड भेसळ होते आहे याला वैद्यकीय दहशतवाद असे म्हणावे लागेल.ऑपरेशन व्यतिरिक्त एखादी समस्या बरी होत असेल तरी सुद्धा ऑपरेशन करण्याचा सल्ला डॉक्टर देत असतात आणि भरपूर पैसा पेशंट कडून उकळून घेत असतात याचे मुळे अनेक लोक दवाखान्यात न जाताच दगवून जातात कारण पैशाची कमतरता,गरिबी वैद्यकीय आतंकवाद हा सुद्धा प्रचंड घातक आहे तो प्रत्यक्ष दिसत नहीं पण गुप्त पने समाज पोखरतो अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त करतो.
सांस्कृतिक आतंकवाद समाज छिन्न विच्छिन्न करतो आहे.पारंपरिक शुद्ध असणाऱ्या परंपरांना तडा जातो आहे तरुण मुल मुली स्वातंत्र्य आणि जगातील बदल यामुळे आपला पंथ,समुदाय सोडून विवाह करत आहेत.सरकार सुद्धा त्या गोष्टीला पैसा देऊन संरक्षण देत आहे.यामध्ये अनेक मुली प्रेम प्रसंगात आपल आयुष्य सुंदर करता करता आयुष्याची माती सुद्धा करत आहेत.तरुण मुलींचे आई वडील आपल्या मुलींच्या भविष्याबाबत चिंतित आहेत त्यामुळे मुलींचे शिक्षण पूर्ण न होऊ देता च लग्न उरकून टाकत आहेत.सांस्कृतिक दहशतवाद समाजास लागलेली कीड आहे जी प्रस्थापित सामाजिक मूल्ये आणि परंपरा नष्ट करून अराजक निर्माण करणारी विकृतीच आहे आता ती थांबवणे फार कठीण च.
गांधीजी म्हणाले होते की भारत हा खेड्यांचा देश आहे आणि ते खरेच आहे .निसर्गाच्या कुशीत असणारे टुमदार गाँव आणि त्या गांवचे सभोवार असणारी सुपीक जंगल,सुपीक शेती,वाहणारी नदी,तलाव हे सगळं कसं स्वर्गमय च..गावागावात सुद्धा अनेक जाती,पंथ आसतात पण काही गाँव एकाच समूहाचे आहेत.जो पर्यंत राजकारण गावात आले नाही तो पर्यंत सगळ ठीक होत पण राजकारण आले आणि एकाच घरातील दोघे भाऊ असणारे व्यक्ती एकमेकांचे विरोधात उभे राहू लागले हे दुःखदायक चित्र निर्माण झाले.अगदी गावातील निवडणूक जिंकावयास लोकांना पार्टी देने,दारू देने असे प्रकार सुरू झाले.निवडून गेलेले प्रतिनिधी काहीच करीत नाही म्हणून किंवा तो आपल्या समुदायाचा नाही म्हणून त्यांचेकडून पैसे घेऊन मोकळं व्हायचं आणि मत द्यायचं असा प्रकार वाढला व एका नव्या अरिष्टाची पायाभरणी झाली जी देशाचे लोकातंत्रास आतंकित करणारीच आहे.गाव पातळीवर च नाही तर शहरात सुद्धा अशीच स्थिती निर्माण होते आहे.
एखादा व्यक्ती कितीही चांगला असला तरीही त्याची जात आणि धर्म बघून मत दिल्या जाते अशी स्थिती निर्माण झालेली आहे.समाजातील अराजक आणि गैर विश्वास हाच अनेक आतंकीत करणाऱ्या गोष्टीचे जनक आहे.समाजातआर्थिक,सामाजिक,सांस्कृतिक,कौटुंबिक,इतिहासिक,भौगोलिक,धार्मिक इत्यादी प्रकारचा दहशतवाद वाढत आहे त्यापैकी सूक्ष्म आर्थिक आतंकवाद हा प्रचंड खतरनाक आहे यात गोर गरीब,मध्यम वर्ग भरडल्या जातो आहे.महागाई मुळे रोजच्या वापरातील वस्तू सुद्धा सामान्य माणूस घेऊ शकत नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे.सर्व धर्म,पंथाच्या लोकांनी आपला धार्मिक कलह आणि अहं बाजूला ठेवून सामाजिक मुळ पाया मजबूत करण्याचा प्रयत्न केला तरच येत्या काळात आपली लोकशाही अबाधित राहू शकते अन्यथा आपण हे राज्य चालविण्याच्या लायकीचे नाहीत अशी लक्षणं आताच दिसायला लागली आहेत.पोप ,इंग्लंडची महाराणी भारता सोबत आता स्वातंत्र्यानंतर काहीच संबंध उरला नाही तरीही त्यांचे मृत्यू नंतर भारतात राजकीय दुखवटा पाळल्या जाणे आणि ध्वज अर्ध्यावर आणून ठेवणे हे चांगले भाकीत नव्हेच.दिल्ली,मुंबईत काय चालू आहे याचा विचार न करता प्रत्येकाने आपल्या आजूबाजूचा च अर्थात गावाचा जरी विचार केला तरी परिस्थिती बदलू शकते.असो..म्हातारी मेली याचे दुःख नाही पण काळ सोकावतोय हे बरे नव्हे…
✒️मा.गुरुदेव(मो.9767508309)



