▪️गारपिट विम्यापसून वंचित ठेवणाऱ्यांवर निलंबनाची कार्यवाही करण्याची मागणी !
✒️मोर्शी(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
मोर्शी(दि.26मार्च):- हवामानावर आधारित संत्रा पिकाचा गारपीट विमा काढून सुद्धा गारपिट विम्यापासून वंचित ठेवणाऱ्यांवर निलंबनाची कार्यवाही करून संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना गारपिट वीम्यामध्ये सहभागी करून घ्यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके, ग्राम पंचायत सदस्य सचिन उमाळे, अतुल काकडे, मंगेश होले यांनी विभागीय कृषी सहसंचालक अमरावती, जिल्हा कृषी अधीक्षक यांच्या कार्यालयात धडक देऊन निवेदना द्वारे करण्यात आली.
मोर्शी तालुक्यातील प्रगतिशील संत्र उत्पादक शेतकरी रुपेश वाळके यांनी 2024 – 2025 करीता गारपीट विमा मोर्शी येथील भारतीय स्टेट बँक शाखा मोर्शी येथून नोव्हेंबर २०२४ मध्ये काढला असून त्याची प्रीमियम रक्कम त्यांच्या खात्यातून डेबिट केल्या गेली. नोव्हेंबर महिन्यापासून काढण्यात आलेल्या विम्याची दखल विमा कंपनीने घेतली नसल्यामुळे संत्र उत्पादक शेतकऱ्यांना गारपीट विम्याच्या मदतीपासून वंचित राहावे लागणार आहे. याबाबत शाखा व्यवस्थापक भारतीय स्पटेट बँक मोर्शी यांच्याकडून संत्रा उत्पादक शेतकरी रुपेश वाळके यांना पत्र प्राप्त झालेले असून त्यामध्ये बँकेने गारपीट विम्याची प्रीमियम रकम डेबिट करून बँकेच्या पार्किंग अकाउंट मध्ये जमा केलेली आहे.
तरीही आज तीन महिने पेक्षा जास्त झालेले असून, आम्ही ईनशुरन्स कंपनी ला विचारल्यास त्यांनी काहीही सविस्तर उत्तर दिलेली नाही. त्यामुळे आम्ही ते प्रीमियम खातेदाराच्या खात्यात मध्ये वर्ग करत आहे त्याची कृपया नोंद घ्यावी. बैंक कुठल्या प्रकारच्या गारपीट क्लेम साठी जबाबदार राहणार नाही, याची कृपया नोंद घावी अश्या प्रकारे बँकेने संत्रा उत्पादक शेतकरी रुपेश वाळके यांना पत्र व्यवहार केलेला असून संत्रा उत्पादक शेतकऱ्यांकडून गारपीट विम्याचे प्रीमियम भरून सुद्धा संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना गारपीट विम्याच्या मदतीपासून वंचित ठेवणाऱ्यांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करून दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करून संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्यावा व संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना गारपिट विम्यामध्ये ८ दिवसात सहभागी करून न घेतल्यास प्रशासनाच्या व विमा कंपनीच्या चुकीच्या धोरना विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष तथा ग्राम पंचायत सदस्य रुपेश वाळके यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, प्रधान सचिव, कृषी आयुक्त, विभागीय कृषी सहसंचालक, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा कृषी अधीक्षक, युनिवर्सल सोम्पो जनरल इन्शुरनस कंपनी यांच्याकडे निवेदन देऊन करण्यात आली.



