कवी माऊलिकरांच्या काव्य संग्रहाचे मुलीच्या मंगल परिणयात प्रकाशन

70

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चंद्रपूर(दि.24एप्रिल):- आंबेडकरी साहित्य प्रबोधिनी व श्री रेणुका प्रकाशन नागपूरच्या संयुक्त विद्यमाने कवी माऊलीकर देवराव पळसगावकर यांच्या “शब्द खेळ पळस फुलांचे” या काव्य संग्रहाचे प्रकाशन श्रुती या मुलीच्या मंगल परिणयाचे ओचित्य साधून मंगल परिणाया आधी आंबेडकरी साहित्य प्रबोधनी चे अध्यक्ष तथा साहित्यिक प्रा. डॉ. इसदास भडके यांच्या शुभ हस्ते भद्रावती येथील विश्वकर्मा मंगल कार्यालय येथे करण्यात आले.

                                             प्रसिद्ध कवी तथा लेखक अविनाश टिपले यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झालेल्या कार्यक्रमात मंचावर प्रा. डॉ. रवींद्र मुरमाळे, प्रसिद्ध विचारवंत ऍड.भूपेंद्र रायपुरे, शालिक माऊलीकर निवृत्त बिडीओ गोंडपिपरी, कवी देवराव माऊलीकर मंचावर होते.

                                       प्रा.डॉ.इसदास भडके मार्गदर्शन भाषणात म्हणाले की, कवी माऊलीकर यांनी आपल्या “शब्द खेळ पळस फुलांचे” या काव्य संग्रहातून, निसर्ग आणि सामाजिक जाणीवाची सांगड घालून आंबेडकरी विचाराची बांधिलकी स्वीकारून आपल्या कविता अस्विकृत केलेल्या आहेत. असे ते म्हणाले, प्रा.डॉ.रवींद्र मुरमाळे यांनी काव्य संग्रहातून प्रकट होणाऱ्या कवी माऊलीकरांच्या जीवन जानिवांचा परामर्स घेतला. ऍड.भूपेंद्र रायपुरे भद्रावती यांनी त्याच्या कविता संग्रहाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. निवृत्त माऊलीकर बिडीओ यांनी कविता संग्रहाचे निराळेपण मांडले. अविनाश टिपले कवी,लेखक आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की मी त्याच्या काव्य निर्मितीचा साक्षीदार असल्याचे सांगून त्याच्या काव्य संग्रहातील मानवतावादी पैलूवर प्रकाश टाकला. मुलींच्या लग्नात काव्य संग्रहाचे प्रकाशन व्हावे ही कविची मनोमन इच्छा होती ती मंगल परिणयाच्या निमित्ताने पूर्ण झाली.

लग्न संभारंभात पुस्तक प्रकाशित होत आहे याची उत्सुकता उपस्थित लोकमध्ये जाणवली. या उपक्रमाचे अनेकांनी कौतुक केले. त्याच बरोबर असे उपक्रम व्हावेत अशी अपेक्षा पण व्यक्त केली. कवी माऊलीकर यांनी कविता संग्रह निर्मिती वर भाष्य केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, संचालन ,आणि आभार प्रदर्शन प्रसिद्ध कवियत्री सीमा भासारकर यांनी केले. या सोहळ्यास बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.