

चंद्रपूर – महाराष्ट्र राज्यातील सर्व वाहनधारकांसाठी HSRP (High Security Registration Plate) लावणे अनिवार्य करण्यात आलेले आहे. शासनाच्या निर्देशानुसार यासाठी अंतिम मुदत 15 ऑगस्ट 2025 असं निश्चित करण्यात आलेली आहे. तथापि काही कारणास्तव नागरिकांने आपल्या वाहनांस वेळेच्या आत ही प्लेट बसवणे कठीण जात आहे. त्याचे मुख्यत अडचणी: HSRP पोर्टलवरील अडचणी: वेबसाइट / पोर्टल वर वारंवार तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत, अपॉइंटमेंट न मिळणे: अधिकृत डीलर किंवा फिटमेंट सेंटरवर वेळेवर अपॉइंटमेंट मिळत नाही., ग्रामिण भागातील मर्यादा: अनेक ग्रामिण भागात अद्यापही अधिकृत फिटमेंट केंद्र पोहोचलेले नाहीत, मोबाईल नंबर/ नाव चुकीचे असल्यास बदलास विलंब: चुकीच्या माहितीमुळे अर्जामध्ये त्रुटी असून सुधारणेसाठी वेळ लागत आहे, मोठ्या प्रमाणात अपूर्ण प्रकरणे: अजून हजारो वाहनधारक HSRP साठी प्रतीक्षेत आहेत. तसेच राज्यातील ऑटोरिक्षा चालकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. तरी नविन परमिट देणे बंद करण्यात यावे. तसेच धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटोरिक्षा चालक आणि अॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्यात आली त्याची अंमलबजावणी त्वरित करण्यात यावी.
तसेच महाराष्ट्र राज्यात इलेक्ट्रॉनिक ऑटोरिक्षा व ई-रिक्शा मोठ्या संख्येने वाटप केले आहे याच्यावर प्रतिबंध लावण्यात यावे. तसेच कल्याणकारी महामंडळातील मोठयाप्रमाणात फी आकारली आली ती कमी करण्यात यावी. या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, परिवहन मंत्री, परिवहन आयुक्त, बल्लारपूरचे आमदार सुधीर मुनगंटीवार या मागणीचे निवेदन सादर करण्यात आले. या मागणीच्या HSRP लावण्याची अंतिम मुदत किमान ६ महिने मुद्दत वाढवून द्यावी, जेणेकरून सर्व वाहनधारक वर्ग आपल्या वाहनांस अधिकृतपणे HSRP नंबर प्लेट बसवून घेतील. अन कायद्याचे पालन करू शकतील असा आवाहन महाराष्ट्र ऑटोरिक्षा चालक मालक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र खांडेकर यांनी व्यक्त केले आहे.



