

✒️नागपूर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
नागपूर(दि.3जून):- श्रद्धा, लालच अन अविवेकाच्या भरात गुरु शोधू नका, बुवाबाबाच्या दरात हे समजून सांगण्याची वेळ महाराष्ट्र राज्यातील जनतेवर आली आहे. आजच्या आधुनिक आणि वैज्ञानिक प्रगतीच्या युगातही समाजात एवढी अंधश्रद्धा कर्मकांड वाढत आहे की, लोकं विचार करणे विसरले त्यामुळे अविवेकी होत आहेत.
याचा फायदा घेऊन ढोंगी बाबा बुवा महाराज आणि धर्मांध राजकारणी समाजाला अधिकाधिक अंधश्रद्धाळू कर्मकांड करण्यासाठी भावनिक बनवून देवा धर्माच्या नावावर समाजातील लोकांचे आर्थिक, शारीरिक, भावनिक, राजकीय शोषण करून अतिविलासी होत आहेत. सत्ता, संपत्तीच्या बळवर महिलांच्या अब्रूचा भोग घेतांना दिसत आहेत. म्हणूनच अशोक खरात आणि रुपाली चाकणकर यांचे प्रकरण लक्षवेदी ठरले आहे. त्यांच्यातील भोगप्रवृत्ती समाजाला नैतिक दृष्ट्या पंगू बनवत आहे. या पार्श्वभूमीवर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे काम खूप वाढले आहे. यासाठी उच्च शिक्षित लोकांनी वैचारिक प्रबोधन करण्यासाठी पुढे आले पाहिजे पण तसे होतांना दिसत नाही.
उलट हा उच्च शिक्षित सुरक्षित नोकरी करणारा वर्ग अंधश्रद्धा कर्मकाडात जास्त गुंतलेला दिसतो. त्यामुळे अंधश्रद्धा निमूलन समितीच्या पदाधिकारी पदी उच्च शिक्षित व्यक्तीची निवड अपेक्षित असते. म्हणूनच प्रा.संध्या राजुरकर मॅडम यांची अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नागपूर जिल्हा अध्यक्षपदी निवड ही समितीच्या कामाची प्रबोधनाची जबाबदारी निर्भीड, निर्भय, निपक्षपाती पत्रकारिता करणाऱ्या दैनिक सौरभ च्या निवासी संपादक, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक, सामाजिक जाणीव असलेल्या प्रा.संध्या राजुरकर यांची अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नागपूर जिल्हा अध्यक्षपदी निवड ही आजच्या परिस्थितीत समितीचा गौरव करणारी आहे.
प्रा.संध्या राजुरकर मॅडम यांची अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नागपूर जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्यामुळे त्यांचे सर्व संस्था संघटनेच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे.







